28 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरविशेषतिकीट विक्री, वाढलेले हॉटेलचे दर, विमानांचे भाडे यावरून चाहते नाराज !

तिकीट विक्री, वाढलेले हॉटेलचे दर, विमानांचे भाडे यावरून चाहते नाराज !

भारतात होणारी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा

Google News Follow

Related

अहमदाबादमध्ये ५ ऑक्टोबर पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, सामन्यांचे वेळापत्रक बदलत असल्याने चाहते निराश झाले आहेत. मागील काळात भारताकडे यजमानपद होते तेव्हा एक वर्ष अगोदर तिकीट विक्री व्हायची. आता मात्र केवळ दीड महिना शिल्लक असताना क्रिकेट सामन्यासाठी  तिकीट विक्रीवरून चाहत्यांमध्ये नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे.

यावेळचा विश्वचषक भारतात आयोजित केला जात आहे, याची जाणीव सर्वांनाच आहे. यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक उशिरा जाहीर केले.२५ ऑगस्टपासून विक्रीला सुरुवात होणार आहे.केवळ दीड महिना शिल्लक असताना तिकीट विक्री सुरू होणार असल्याने चाहते संताप व्यक्त करत आहेत.विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक विलंबानंतर जूनमध्ये जाहीर करण्यात आले आणि या महिन्याच्या सुरुवातीला यजमान BCCI आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे तब्बल नऊ सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले.आता, हैदराबाद राज्य युनिटला ९ आणि १० ऑक्टोबर रोजी होणार्‍या खेळांमधील एक दिवसाचे अंतर हवे आहे, ज्यामुळे चाहत्यांना अधिक अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे.

२०११ मध्ये, जेव्हा भारताने स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवले होते तेव्हा जून २०१० मध्ये तिकीट विक्री सुरू झाली. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या प्रवासाची आणि निवासाची योजना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.तसेच २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या विश्वचषकाचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर जाहीर केल्याने चाहत्यांना त्यांची व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ मिळाला होता.

हे ही वाचा:

दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !

‘रघुराम राजन राजकीय नेते झाले आहेत’!

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी राज्याराज्यात बनावट संस्था, विद्यार्थी

आशिया कप संघनिवडीसाठी रोहित शर्मा उपस्थित राहणार

सतत बदलणारे सामन्याचे वेळापत्रक तसेच तिकीट विक्रीकरिता मिळालेला कमी अवधी यामुळे देशातच नाहीतर भारताच्या पलीकडील चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.सिंगापूरमध्ये राहणाऱ्या ऋषभ सिंघवी या क्रिकेटप्रेमीने अनेक भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी फ्लाइट आणि राहण्याच्या सोयींमध्ये सुमारे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.मात्र, सामन्याच्या तिकिटांची हमी नसल्यामुळे त्याने केलेल्या नियोजनावर पाणी फेरल्याचे सांगितले.मी चार ते पाच महिन्यांपासून याची योजना करत आहे, परंतु तिकीट विक्री अद्याप सुरू झाली नसल्यामुळे, मला काय होईल हे माहित नाही,” सिंघवी यांनी चिडचिडेपणाने आपली चिंता व्यक्त केली.

दिल्लीस्थित क्रिकेटप्रेमी अतिरव कपूरने जूनमध्ये झालेल्या घोषणेनंतर अहमदाबादमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी फ्लाइटचे बुकिंग केले होते.मात्र , सामन्याच्या तारखेच्या बदलीमुळे केलेल्या योजनेमध्ये अडचण निर्माण होत असल्याचे त्याने सांगितले. मी आधीच दिल्ली-अहमदाबाद परतीच्या फ्लाइटसाठी ४०,००० रुपये भरले आहेत… हा एकंदर गोंधळ आहे,” किंमती आधीच गगनाला भिडल्या आहेत, हे लक्षात घेऊन, पुन्हा वेळापत्रक फ्लाइटसाठी मला खूप पैसे लागतील,” कपूर म्हणाले.

भारतात आम्हाला अशा आव्हानाचा सामना करावा लागत आहे. ज्यांना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियातून यायचे आहे त्यांचे काय. तुम्ही तिकिट नसताना कसे नियोजन करता आणि त्याशिवाय वेळापत्रक बदलत राहते?” कपूर पुढे म्हणाले.अहमदाबादमधील ब्लॉकबस्टर क्लॅशसाठी निवासाची किंमत ५०,००० प्रति रात्र भाडे असल्याने चाहत्यांनी त्याऐवजी रुग्णालयातील बेड बुक करण्याचा अवलंब केला आहे.

BCCI संलग्न राज्य युनिटच्या अधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही वेळापत्रक आणि तिकिटांच्या बाबतीत तीन-चार महिने उशीर केला आहे, परंतु मला खात्री आहे की अखेरीस, आम्ही यशस्वी विश्वचषक करू. आम्ही चाहत्यांना नियोजनासाठी किमान सहा महिने दिले असते तर बरे झाले असते , “अधिकारी म्हणाले.विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणार्‍या राज्य युनिटच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की २०१९ च्या टाइमलाइन आणि आगामी आवृत्तीची तुलना करू नये.एक वर्षापूर्वी घोषणा करणे खूप आगाऊ आहे. ते चार ते सहा महिन्यांपूर्वी केले पाहिजे.

इतर देशांच्या तुलनेत भारतात आमच्याकडे जी गुंतागुंत आहे, त्यासाठी आम्हाला अनेक अधिकार्‍यांकडून अनेक मंजुरींची गरज असते. चाहत्यांना नक्कीच अधिक वेळ दिला पाहिजे जेणेकरून ते चांगले नियोजन करू शकतील. हा भविष्यासाठी एक धडा आहे,” असे ते म्हणाले.या गोंधळाच्या दरम्यान, आगामी एकदिवसीय विश्वचषक अजूनही जबरदस्त यशासाठी तयार आहे. संघटनात्मक अडचण असूनही, भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या उत्कटतेने देशभरातील सर्व दहा स्थळे भरतील असा अंदाज आहे.

अतीरव कपूरने अनेक चाहत्यांच्या भावनांचा सारांश सांगितला, “जोपर्यंत चाहते येत राहतील तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. ज्या दिवशी चाहते स्टेडियममध्ये येणे बंद करतील, कदाचित अधिकारी काळजी घेण्यास सुरुवात करतील.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा