पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या कारला प्रवासी ट्रेनने जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू झाला, तर किमान पाच विद्यार्थी जखमी झाले. काही जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा अपघात सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मुर्शिदाबादमधील कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या क्रॉसिंगवर झाला. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कार रेल्वे रुळ ओलांडत असतानाच निमतिता-काटवा प्रवासी ट्रेनने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळी किंवा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. वाहनचालकालाही जीव गमवावा लागला. जखमी झालेल्या किमान पाच विद्यार्थ्यांना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
चीनने २२ कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरला!
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी कोसळला रॉड, कार्यकर्ता मृत्युमुखी
रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार? प्रशिक्षकांचे वक्तव्य चर्चेत
भेसळीवर FDAचा राज्यभर धडाका; पारशी डेअरीचा परवाना निलंबित
स्थानिक नागरिकांनी दावा केला की, एका ट्रेनला मार्ग दिल्यानंतर रेल्वे फाटक उघडण्यात आले होते. त्यानंतर कार रुळ ओलांडू लागली. मात्र दुसऱ्या रुळावरून येणाऱ्या प्रवासी ट्रेनसाठी फाटक पुन्हा बंद करण्यात आले नाही. यामुळेच हा भीषण अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या निष्काळजीपणाची चौकशी केली जात आहे. पूर्व रेल्वेने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी १० सदस्यीय विशेष पथक घटनास्थळी पाठवले आहे. अपघाताचे नेमके कारण, रेल्वे कर्मचाऱ्यांची भूमिका आणि फाटक उघडे का राहिले, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. या अपघातानंतर पूर्व रेल्वेच्या हावडा विभागातील आजीमगंज-काटवा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनास्थळी पोलीस, रेल्वे अधिकारी आणि बचाव पथके तातडीने दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
