न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना समर्पित भारत घडवू

संविधान हत्या दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा संकल्प

न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना समर्पित भारत घडवू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संविधान हत्या दिना’निमित्त म्हटले की, हा दिवस भारतीय लोकशाहीला निर्दयपणे चिरडण्यात आलेल्या त्या काळ्या कालखंडाची आठवण करून देतो. तसेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानातील आदर्शांना सदैव समर्पित राहणारा भारत घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “आज आपण भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या कालखंडांपैकी एक असलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे ठामपणे संरक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली अर्पण करतो.” ते पुढे म्हणाले, “आणीबाणी हा आपल्या संविधानावर झालेला थेट हल्ला होता. त्या काळात नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यात आले आणि राजकीय नेते, पत्रकार तसेच समाजसेवकांना तुरुंगात डांबण्यात आले. लोकशाहीच्या पायाभूत संस्थांवरही हल्ले करण्यात आले.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “त्या काळाने अशा असंख्य नागरिकांचे विलक्षण धैर्यही दाखवून दिले, ज्यांनी गप्प बसण्यास नकार दिला आणि संविधानात अंतर्भूत असलेल्या मूल्यांचे रक्षण केले.” पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, आपले संविधान हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे प्रतीक आहे. संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठीची आपली सामूहिक बांधिलकी आपण पुन्हा दृढ करतो. संविधानाच्या भावनेतून प्रेरणा घेत आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांप्रती सदैव कटिबद्ध असलेला भारत घडवू.

हे ही वाचा:

पीओकेमध्ये आंदोलन चिघळले; पाकिस्तानने अन्न, इंधन, औषधांचा पुरवठा रोखला?

व्हेनेझुएलाला शक्तिशाली भूकंपांचा दुहेरी तडाखा; अनेक इमारती कोसळल्या

वैभव सूर्यवंशीसाठी ICCचा खास नियम

जमीन बळकावल्या प्रकरणी माजी तृणमूल आमदारासह मुलीला नोटीस

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “संविधान हत्या दिन आज त्या काळ्या काळाची आठवण करून देतो, जेव्हा भारतीय लोकशाहीची निर्दयपणे गळचेपी करण्यात आली होती. हा दिवस आपल्याला लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी कायम जागरूक आणि कटिबद्ध राहण्याची प्रेरणा देतो. आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व व्यक्तींना माझा सादर नमस्कार.”

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितही शेअर केले :

“स्वातन्त्र्यात् सुखमाप्नोति स्वातन्त्र्याल्लभते परम्।

स्वातन्त्र्यान्निर्वृत्तिं गच्छेत् स्वातन्त्र्यात् परमं पदम्॥“

याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “स्वातंत्र्यामुळेच मनुष्य सुख प्राप्त करतो, स्वातंत्र्यामुळेच सर्वोच्च यश मिळवतो. स्वातंत्र्यामुळेच त्याला मानसिक शांती लाभते आणि स्वातंत्र्याच्याच माध्यमातून तो सर्वोच्च स्थान प्राप्त करतो.”

Exit mobile version