28.2 C
Mumbai
Saturday, August 15, 2026
घरविशेषमहाराष्ट्राला बनवणार देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’!

महाराष्ट्राला बनवणार देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला निर्धार

Google News Follow

Related

८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, यंदाच्या पहिल्या सहामाहीत राज्याने सुमारे ८.८ टक्के आर्थिक विकासदर नोंदवला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा विकास काही मोजक्या भागांपुरता मर्यादित न राहता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्याला ‘ग्रोथ इंजिन’ बनवण्याचे उद्दिष्ट असून, सध्या सुमारे १३ जिल्ह्यांनी या दिशेने लक्षणीय प्रगती केली असल्याचे त्यांनी नमूद केले. गडचिरोलीपासून पालघरपर्यंत विकासाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र हे देशातील प्रमुख स्टार्टअप आणि गुंतवणुकीचे केंद्र बनत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून, त्यातून तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात उभारण्यात येणाऱ्या ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, हा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः मराठवाड्यासारख्या दुष्काळप्रवण भागात पाणी व्यवस्थापन आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या मते, विकसित भारत म्हणजे केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर गरीब, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे होय. प्रत्येक घटकाचा विकास हाच ‘विकसित भारत’ संकल्पनेचा खरा अर्थ असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

‘टीटीपी’मध्ये सामील होण्याचा प्लॅन? बंगळूरूमधून असफूल मलिकला अटक

मोदींचा ‘बांधणी फेटा’ चर्चेत; वस्त्रपरंपरेला अनोखी मानवंदना!

मोदी ठरले सलग सर्वाधिक स्वातंत्र्यदिनाचे भाषण करणारे गैर-काँग्रेसी पंतप्रधान!

ऐतिहासिक क्षण! लाल किल्ल्यावर प्रथमच ‘वंदे मातरम्’चा जयघोष

फडणवीस यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती झाली आहे. याच विकासप्रवासात महाराष्ट्राची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा