‘मी नरकात जाईन, पण पाकिस्तानात…’

गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांचे परखड मत 

‘मी नरकात जाईन, पण पाकिस्तानात…’

बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतात. जावेद अख्तर हे त्यांच्या चित्रपटांसाठी आणि गाण्यांसाठी तसेच त्यांच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखले जातात. सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करण्यास ते कधीही मागेपुढे पाहत नाही. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. आता जावेद अख्तर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सहभागी झालेले जावेद अख्तर म्हणाले, पाकिस्तानात जाण्यापेक्षा नरकात जाणे पसंत करेन.

ते म्हणाले, “दोन्ही बाजूंची लोकं मला शिवीगाळ करतात. एक मला काफिर म्हणतो, मी नरकात जाईन असे म्हणतो. तर दुसरा मला जिहादी म्हणतो, पाकिस्तानात जाण्यास सांगतो. म्हणून, जर माझ्याकडे नरकात जाण्याचा किंवा पाकिस्तानात जाण्याचा पर्याय असेल तर मला नरकात जायला आवडेल”.

जावेद अख्तर पुढे म्हणतात, ‘काय होतंय की जर तुम्ही फक्त एकाच पक्षाच्या वतीने बोललात तर तुम्ही फक्त एकाच पक्षाला दुःखी करत. पण जर तुम्ही सर्वांच्या बाजूने बोललात तर तुम्ही अधिक लोकांना दुःखी करता. मी तुम्हाला माझे  एक्स अकाऊंट आणि व्हॉट्सॲप दाखवू शकतो, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी मला शिवीगाळ केली जाते.

हे ही वाचा : 

देहरादूनमध्ये ६ बांगलादेशी नागरिकांना अटक

चारमिनारजवळ भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू

देशहिताबाबत काँग्रेसला काही बोलताच येत नाही

प. बंगालात बनावट आधार रॅकेटचा पर्दाफाश

ते म्हणाले, बरेच लोक माझे कौतुक करतात, माझी प्रशंसा करतात आणि माझा उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करतात, परंतु हे देखील खरे आहे की दोन्ही बाजूंचे कट्टरपंथी मला शिवीगाळ करतात. आणि हे असेच असायला हवे कारण एक पक्ष जर थांबला तर मला असे वाटेल कि मी काही चुकीचे करत आहेत.  यासोबतच त्यांनी सांगितले की जेव्हा ते मुंबईत आला तेव्हा तो साडेएकोणीस वर्षांचे होते. ते महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतात आणि त्यांना जे काही मिळाले आहे, ती सर्व मुंबईची देणगी असल्याचे सांगितले.

 

Exit mobile version