32 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
घरविशेषदैनिक जागरण समूहाचे योगेंद्र गुप्ता कालवश

दैनिक जागरण समूहाचे योगेंद्र गुप्ता कालवश

Google News Follow

Related

दैनिक जागरण समूहाचे अध्यक्ष योगेंद्र मोहन गुप्ता यांचे निधन झाले आहे. शुक्रवार १५ ऑक्टोबर रोजी कानपूर येथे त्यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून कानपूर मधील एका स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण विजयादशमीच्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गुप्ता यांच्या जाण्याने पत्रकारिता तसेच जाहिरात आणि कला जगताचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

शनिवार १६ ऑक्टोबर रोजी गुप्ता यांच्यावर गंगाकिनारी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. तर रविवारी दुपारी शांतीपाठ आणि हवन आयोजित करण्यात आला आहे. योगेंद्र मोहन गुप्ता हे आपल्या तरुणपणापासूनच दैनिक जागरण समुहाच्या कामकाजाशी जोडले गेले होते. त्यांनी जाहिरात क्षेत्राचा कारभार सांभाळायला सुरुवात केली होती. जागरण समूहाला आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यात योगेंद्र मोहन गुप्ता यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

हे ही वाचा:

धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने

यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंकडे केली ही ‘अजब’ विनंती

आर्यन खानला शाहरुखने पाठवली मनीऑर्डर

योगेंद्र गुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात. “दैनिक जागरण समूहाचे अध्यक्ष योगेंद्र मोहन गुप्ता यांच्या निधनामुळे अत्यंत दु: ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कला, साहित्य आणि पत्रकारिता जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती!”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा