26 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरविशेषराधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम

Google News Follow

Related

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे उघडले आहेत. मागच्या आठवड्यात सलग पावसामुळे कोल्हापुरात पुर आला होता. आता हा पूर ओसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरले असून धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातून भोगावती नदीत ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवर आहे. धरणातून सोडण्यात आलेले पाणी भोगावती नदीमार्गे पंचगंगा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे आता पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती

पुण्यात २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त !

उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी

इराणमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हनीयेह ठार

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अद्याप पूरस्थिती कायम आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग न झाल्याने शिरोळ तालुक्याला पुराचा फटका बसला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा