पाकिस्तानमधील फुटीरतावादी संघटना बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानच्या १७ सैनिकांना ताब्यात घेतले असून त्यापैकी १० बॅलोच नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही कारवाई त्यांच्या “ऑपरेशन हेरोफ” मोहिमेचा भाग असल्याचे म्हटले आहे. बीएलएच्या दाव्यानुसार ताब्यात घेतलेल्या १७ जणांपैकी १० जण स्थानिक पातळीवर सुरक्षा यंत्रणांशी संबंधित होते आणि त्यांना इशारा देऊन सोडण्यात आले. मात्र उर्वरित सात जण हे नियमित पाकिस्तान आर्मी मधील सैनिक असल्याचे संघटनेने सांगितले आहे.
हे ही वाचा:
जयेश मेस्त्री यांच्या ‘जादूचा दिवा’ला भा. रा. भागवत पुरस्कार
अमरावतीत न्याय देणाऱ्यांनाच आता न्यायाची गरज?
उद्धव-राज यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर वेगळे आकडे दिसले असते!
बांगलादेशकडून पंतप्रधान मोदींना शपथविधीचे निमंत्रण
बीएलएने या सात सैनिकांवर बॅलोच नागरिकांवरील कारवाया, जबरदस्तीने बेपत्ता करण्याची प्रकरणे आणि कथित अत्याचारांमध्ये सहभागाचे आरोप लावले आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार या सैनिकांविरुद्ध तथाकथित “बॅलोच राष्ट्रीय न्यायालयात” सुनावणी घेण्यात आली असून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तथापि, या दाव्यांची स्वतंत्र किंवा अधिकृत पुष्टी झालेली नाही. बीएलएने पाकिस्तान सरकारला सात दिवसांची अंतिम मुदत देत बंधी बदल (प्रिझनर स्वॅप) करण्याची मागणी केली आहे. सरकारने चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास या सात सैनिकांची अदलाबदल काही बॅलोच कैद्यांच्या बदल्यात करण्याची तयारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेबाबत पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून तात्काळ अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र बलोचीस्थान प्रांतात गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा दल आणि फुटीरतावादी गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. बीएलए ही संघटना या भागात अधिक स्वायत्तता किंवा स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत दीर्घकाळापासून सक्रिय आहे. पाकिस्तान सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले असून सुरक्षा दलांकडून तिच्याविरोधात सातत्याने कारवाया केल्या जातात.
बॅलोचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रांत असला तरी विकास, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्वाबाबत स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे येथे अस्थिरता कायम आहे. बीएलएच्या या ताज्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या प्रदेशातील तणाव आणि सुरक्षा परिस्थिती चर्चेत आली आहे. पुढील सात दिवसांत पाकिस्तान सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते आणि काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







