26 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरक्राईमनामात्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक

त्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक

बीएसएफची मोठी कारवाई

Google News Follow

Related

देशातील बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हुसकावून लावण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली असून देशभरात विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. अशातच, सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने त्रिपुरामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. बीएसएफ जवानांनी बांगालादेशी नागरिकांसह काही दलालांनाही अटक केली आहे.

त्रिपुरामध्ये बीएसएफने मोठी कारवाई करत कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय आणि पासपोर्टशिवाय बांगलादेशींना भारतात प्रवेश करण्यास मदत करणाऱ्या तीन भारतीय दलालांना अटक केली आहे. तर, १३ बांगलादेशी लोकांनाही बीएसएफ जवानांनी अटक केली आहे. बीएसएफच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ बांगलादेशी नागरिक आणि तीन भारतीय दलाल यांना गुरुवारी रात्री उत्तर त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील कैलाशहर येथून अटक करण्यात आली. सर्व १३ घुसखोर बांगलादेशातील मौलवी बाजार, सुनामगंज, नेत्रगंज, नेत्रकोना आणि बारिसल येथील रहिवासी होते. अटक केलेल्या भारतीय दलालांची ओळख काजल दास, अजित दास आणि प्रसनजीत देबनाथ अशी झाली आहे.

सीमापार बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांमध्ये, गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री, आगरतळा रेल्वे स्थानकावर सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) कर्मचाऱ्यांसह संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बांगलादेशींना भारतीय हद्दीत अनधिकृत प्रवेश करण्यास मदत करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली.

हे ही वाचा : 

संजय राऊत यांनी पुन्हा दाखवले स्वबळ; मविआला डच्चू

प्रयागराजमध्ये हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर आढळले गायीचे शिर

उत्तराखंडमध्ये बर्फाखाली अडकलेल्या ४७ कामगारांची सुटका; ८ कामगारांचा शोध सुरू

ट्रम्प विरुद्ध झेलेन्स्की: शांतता, युद्धाच्या मुद्द्यावरून झाली बाचाबाची

सीमापार अंमली पदार्थांच्या तस्करीवर आणखी एका कारवाईत, बीएसएफच्या जवानांना सेपाहिजाला जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय तस्करांच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. बीएसएफ जवानांनी आव्हान दिल्यानंतर, तस्करांनी माल सोडून भारताच्या दिशेने पळ काढला. परिसरात कसून शोध घेतल्यावर २०,००० गोळ्या असलेले २० पाकिटे जप्त करण्यात आले, ज्यांची किंमत २ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, बीएसएफ जवानांनी त्रिपुरातील भारत- बांगलादेश सीमेवरील वेगवेगळ्या ठिकाणांहून १६.८० लाख रुपयांच्या इतर प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी बीएसएफने आपली दक्षता आणि ऑपरेशनल प्रयत्न लक्षणीयरीत्या वाढवले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा