लाल किल्ल्यावर २२ वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निकाल दिला आहे. या हल्ल्यातील दोषी आरिफ उर्फ अशफाक या दहशतवादीची फाशीची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे. आरिफने सर्वोच्च न्यायालयात आपली शिक्षा माफ करण्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. तो म्हणाला की त्याने यापूर्वीच जन्मठेपेच्या बरोबरीची शिक्षा भोगली आहे.
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अश्फाक याला सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. २२ डिसेंबर २००० रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात २ लष्करी जवानांसह ३ जण शहीद झाले होते. या प्रकरणात ११ आरोपी पकडले गेले. त्यानंतर त्यांना शिक्षा झाली होती. आरिफ उर्फ अशफाक हा याच प्रकरणात पकडलेला मुख्य आरोपी आहे. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. नंतर कोर्टाने आरिफला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. मात्र अरिफने फाशीला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हे ही वाचा:
भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी
नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती
घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….
दादर, ठाणे रेल्वे स्टेशनवरील ‘स्टॉल’ उचलणार
लाल किल्ल्याच्या आत दहशतवाद्यांनी लष्करी जवानांवर हल्ला केला होता. हल्ला करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३० लाखांहून अधिक रुपये ट्रान्सफर करण्यात आले. हवाला या रकमेतून शस्त्रे खरेदी करण्यात आली. लष्कराच्या सहा दहशतवाद्यांनी लाल किल्ल्याच्या आत लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. रात्री ९ वाजता लाल किल्ल्याच्या आत सुरू असलेल्या लाइट अँड साऊंड कार्यक्रमादरम्यान एके-४७ आणि हँडग्रेनेडने सज्ज झालेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.