31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरक्राईमनामापाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्ती!

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्ती!

दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवणार नाही

Google News Follow

Related

जे दहशतवादी मूळचे जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी आहेत परंतु आश्रय घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले आहेत अशा सर्व दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे.यासंदर्भात राजौरी इथं आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी माहिती दिली. अशा दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवणार नसून जर त्यांनी परत येण्याचे प्रयत्न केला तर त्यांना ठार मारले जाईल, असे सिंग म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आश्रय घेणाऱ्या सर्व स्थानिक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशा दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे.जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी याबाबतची माहिती दिली.पोलिसांकडे जम्मू-काश्मीरच्या विविध भागात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची यादी असल्याचे सिंग यांनी सांगितले.ही जप्तीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहिती दिलबाग सिंग यांनी दिली.
हे दहशदवादी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे बसून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत.या दहशतवाद्यांवर बारीक नजर ठेवली जात असून त्या दहशतवाद्यांना कोणतीही दयामाया दाखवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.जर त्यांनी पुन्हा परत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मारले जाईल, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

चार वर्षात आर्थिक गुन्हेगारांकडून ११.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता जप्त

दहीहंडीत १९५ गोविंदा जखमी, मात्र अनर्थ टळला

आयआयटीचे संचालक म्हणतात मांसाहारामुळे हिमाचलमध्ये ढगफुटी

स्तूपांचे शहर सांची होणार भारतातील पहिले ‘सौर शहर’

हे दहशतवादी नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न करत आहेत पण आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही.दहशतवादविरोधी कारवायांमध्ये ग्राम संरक्षण समिती (VDCs) मोठी भूमिका बजावत आहेत.सीमा ग्रिड आणखी मजबूत करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी लष्करासह पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून घुसखोरीचे सर्व मोठे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असल्याचे सिंग म्हणाले.दहशतवादी संघटनांचा निधी रोखण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेसह इतर सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांच्या ठिकाकांना लक्ष्य करत आहेत.

कुलगाम-शोपियन जिल्ह्यांमधून ते जम्मू विभागातील राजौरी-पुंछ जिल्ह्यांकडे काही दहशदवादी जात असताना पोलिसांच्या चकमकीत तिघांना ठार करण्यात आले आहे.या चकमकीत राजौरी आणि रियासी येथे दोघांना ठार केले तर तिसरा हा रियासी येथील डोंगरावरुन घसरून त्याचा मृत्यू झाला.इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती दिलबाग सिंग यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा