34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाएनसीबीची कारवाई; जळगावमधून ४९ पोती गांजा जप्त

एनसीबीची कारवाई; जळगावमधून ४९ पोती गांजा जप्त

Google News Follow

Related

मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावमध्ये धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कारवाईमध्ये एनसीबीने तब्बल १५०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एनसीबीच्या पथकाने १५०० किलो गांजा जप्त केला आहे. आंध्रप्रदेश येथून अमलीपदार्थांची वाहतूक होणार असल्याची खबर एनसीबीला मिळाली होती. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणण्यात आला होता.

एनसीबीने या कारवाई दरम्यान ट्रक पकडला असून या ट्रकमध्ये तब्बल ४९ पोत्यात जवळपास एक टन गांजा जप्त करण्यात आला. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतले. सध्या या दोघांचीही चौकशी सुरु असून एनसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

शिवशाहिरांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी, नियोजनाला सरसावले संघ स्वयंसेवक

अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

राज्यभरात एनसीबीच्या आणि पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी कारवायांनी सध्या जोर पकडला असून काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून २४ किलो चरस मुंबईला पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. या टोळीकडून पोलिसांनी १४ कोटी ४० हजार किंमतीचा २४ किलो चरस जप्त केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा