घोडबंदरला वीर चिमाजी आप्पा यांचे नाव द्या!

घोडबंदरला वीर चिमाजी आप्पा यांचे नाव द्या!

पेशवे बाजीराव यांचे धाकटे बंधू आणि सेनापती ‘वीर चिमाजी अप्पा’ यांनी अनेक वर्षांच्या युद्धानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील इतर किल्ले जिंकण्याबरोबरच घोडबंदर परिसरही मुक्त केला होता. ठाण्यातील ‘घोडबंदर’  ते हेच. घोडबंदरला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी संग्राम फाउंडेशनच्या वतीने आणि जयहिंद अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हे नाव केवळ घोड्यांच्या व्यापारामुळे पडले होते. त्या नावाला विशेष असा ऐतिहासिक गौरव नाही. यासंदर्भात संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल सिंग आणि महासचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करराव पेशवे यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली.

पुष्करराव पेशवे यांनी जय हिंद अभियानाच्या मागण्या लक्षपूर्वक ऐकल्या तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या पराक्रमाला आजही काही लोक मान्यता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी तत्काळ सांगितले, “या अभियानाच्या मोहिमेत मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा आणि जिथे माझी गरज भासेल, तेव्हा मला हाक द्या; मी हजर असेन.”

हे ही वाचा:

जसपाल राणाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण त्यागले

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सिराज यांनी केले खेळाडूंना मार्गदर्शन

ऑनलाईन ड्रायव्हरनेच ‘डल्ला’ मारला

बोरिवलीत पेट्रोल पंपावर थरार

म्हणूनच, इतिहासातील या महान पराक्रमी योद्ध्याला योग्य सन्मान मिळावा यासाठी आम्ही दीर्घकाळापासून घोडबंदर रोडचे नाव बदलून “वीर चिमाजी अप्पा मार्ग” करण्यात यावे, अशी मागणी करत आहोत. इतिहासाने इतक्या शूर आणि पराक्रमी योद्ध्याकडे का दुर्लक्ष केले, हे कळत नाही; परंतु आम्ही आमचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले आहेत.

हा उपक्रम आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास आणि एका महान वीराला खरी श्रद्धांजली अर्पण करण्यास निश्चितच मदत करेल, असे गोपाल सिंग आणि दीपक कुमार त्रिपाठी म्हणाले.

Exit mobile version