30.1 C
Mumbai
Wednesday, May 14, 2025
घरदेश दुनियाभारतातील २२ पाकिस्तानी महिलांना १०० मुले, कुटुंबातील सदस्य ५००च्या घरात

भारतातील २२ पाकिस्तानी महिलांना १०० मुले, कुटुंबातील सदस्य ५००च्या घरात

पाकिस्तानी नागरिकांची तपासणी सुरू केल्यानंतर वास्तव आले समोर

Google News Follow

Related

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात अल्पकालीन किंवा दीर्घकालीन व्हिसावर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची चौकशी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे २२ पाकिस्तानी महिला गेली अनेक दशके दीर्घकालीन व्हिसावर राहत आहेत. या २२ महिलांची एकूण ९५ मुले भारतात जन्मलेली असून, सध्या त्यांचे एकत्रित कुटुंबीयांची संख्या ५०० च्या आसपास आहे. या मुलांनी भारतीय नागरिकत्व घेतले आहे, मात्र या महिला अजूनही पाकिस्तानी नागरिक आहेत.

या २२ महिलांव्यतिरिक्त २ पाकिस्तानी पुरुषही जिल्ह्यात दीर्घकालीन व्हिसावर राहत आहेत. अंदाजे ३५% महिलांना आता नातवंडंही आहेत, कारण त्यांचे कुटुंब सातत्याने वाढत आहे. जरी या महिलांनी आपले पाकिस्तानी नागरिकत्व कायम ठेवले असले तरी त्यांच्याकडे भारतीय सरकारी रेशन कार्ड आणि आधार कार्ड आहेत, ज्यामुळे त्या भारतीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेत आहेत.

सध्या मुरादाबाद पोलीस या प्रकरणाची अधिक तपासणी करत असून या महिलांच्या कुटुंबीयांचा इतिहास व पार्श्वभूमी शोधत आहेत.

हे ही वाचा:

“खेलो इंडिया यूथ गेम्स” ला बिहारमध्ये दमदार सुरुवात

‘नेकी, मेहनत और मशक्कत’

परदेशी चित्रपट ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ म्हणून डोनाल्ड ट्रम्पकडून १०० टक्के टॅरिफ

सिंधुदुर्ग दोडामार्गला घराच्या परवान्यावर उभारला मदरसा, केला जमीनदोस्त!

दरम्यान, इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक हिंदोल सेनगुप्त यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि स्थलांतर धोरणावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “जगात असा दुसरा कोणताही देश नाही ज्याने पुन्हापुन्हा स्वतःलाच हरवले आहे, जितके भारताने केले आहे. ही आत्म-हानी आपल्या इतिहासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य राहिले आहे.”

यापैकी बहुतेक महिला भारतीय पुरुषांशी विवाह करून भारतात आल्या आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड व आधार कार्ड आहेत, पण अजूनही त्या पाकिस्तानी नागरिक आहेत. सर्व महिलांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, पण अद्याप नागरिकत्व मिळालेले नाही. त्यांच्या मुलांना मात्र भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.

हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांची तपासणी वेगाने सुरू केली आहे.

यासंदर्भात विशेषज्ञ सुशांत सरीन यांनी म्हटले, “आपण सापांना दूध पाजतो आणि नंतर आश्चर्यचकित होतो की त्यांनी आपल्याला का दंश केला. आपण शत्रूंना बक्षिसे देतो आणि मित्रांकडे दुर्लक्ष करतो.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा