हैदराबादच्या खैरताबाद येथील ३७ वर्षीय मोहम्मद अहमद याला नोकरीच्या आमिषाने फसवून रशियाला पाठवल्याचा आणि तिथे त्याला युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी भाग पाडल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला आहे. अहमदची पत्नी फिरदौस बेगम यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना निवेदन दिले आहे आणि केंद्र सरकारकडून आपल्या पतीला मदत करून भारतात परत आणण्याची मागणी केली आहे. फिरदौस बेगम म्हणाल्या, “त्याला शस्त्र देण्यात आले आहे आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी सांगितले आहे. त्याचे शेवटचे ठिकाण यूक्रेन सीमेजवळ आहे. सरकारने त्याला मदत करुन परत आणावे.”
यात सहा जण भारतीय होते.
तीने पुढे सांगितले, प्रशिक्षणानंतर, २६ जणांना युक्रेनियन सैन्याशी लढण्यासाठी सीमावर्ती भागात नेले गेले. सीमा जवळ नेले जात असताना अहमदने लष्कराच्या वाहनातून उडी मारून पळून जायचा प्रयत्न केला; पळताना त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम मंदिरात केली पूजा-अर्चना
ऑपरेशन सिंदूर आमच्या आत्मनिर्भरतेचा जिवंत पुरावा
किती टक्के भारतीय गाडी खरेदी करणार ?
एअर इंडियाच्या विमान AI171 अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी
या दरम्यान अहमदने युद्ध लढण्यास नकार दिला; तथापि, कमांडमधील लोकांनी त्याला सांगितले की त्याला जाऊन लढावे लागेल. माझ्या पतीने मला सांगितले की त्याच्या गटातील जवळपास १७ जण युक्रेनियन सैन्याशी लढताना मरण पावले आहेत, असे फिरदौस बेगमने सांगितले. दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना दिलेल्या निवेदनात, फिरदौस बेगम यांनी त्यांच्या पतीला भारतात परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.







