28.2 C
Mumbai
Tuesday, July 7, 2026
घरदेश दुनिया१३ देशांची माघार, भारत खामेनींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित

१३ देशांची माघार, भारत खामेनींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित

इराणने मानले आभार, अमेरिकेचा दबाव भारताने झुगारला

Google News Follow

Related

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला भारताने अधिकृत प्रतिनिधीमंडळ पाठवल्यानंतर इराणने भारताचे विशेष आभार मानले आहेत. भारताची उपस्थिती ही दोन्ही देशांतील ऐतिहासिक मैत्री आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक असल्याचे इराणने म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या राजनैतिक दबावामुळे किमान १३ देशांनी अंत्यसंस्कार सोहळ्यातील सहभाग मागे घेतला किंवा प्रतिनिधींचा दर्जा कमी केला, असा दावा इराणच्या अर्ध-सरकारी तस्नीम वृत्तसंस्थेने केला आहे.

भारत सरकारने या अंत्यसंस्कारासाठी परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल सैयद अता हसनैन यांचे प्रतिनिधीमंडळ तेहरानला पाठवले होते. भारतीय प्रतिनिधींनी खामेनेई यांना श्रद्धांजली वाहत इराणी नेतृत्वाची भेट घेतली. भारताच्या या निर्णयामागे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याचा संदेश असल्याचे मानले जात आहे.

भारतातील इराणी दूतावासाने अधिकृत निवेदनात भारत सरकार आणि भारतीय जनतेचे आभार मानले. भारताने दाखविलेली संवेदनशीलता आणि मैत्रीची भावना इराणी जनता कधीही विसरणार नाही, असे दूतावासाने म्हटले. भारताची उपस्थिती ही दोन्ही देशांमधील हजारो वर्षांच्या सांस्कृतिक नात्याचे आणि परस्पर आदराचे प्रतीक असल्याचेही इराणने स्पष्ट केले.

इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी अनेक देशांशी संपर्क साधून खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. या राजनैतिक दबावानंतर किमान १३ देशांनी आपली प्रतिनिधीमंडळे मागे घेतली किंवा त्यांचा स्तर कमी केला. या देशांमध्ये काही आफ्रिकी, आशियाई तसेच आखाती देशांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अमेरिकेकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

इराणने खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासाठी १०० हून अधिक देशांना निमंत्रित केले होते. रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, इराकसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मात्र बहुतांश पाश्चिमात्य देशांनी या सोहळ्यापासून अंतर राखले.

हे ही वाचा:

श्रीराम मंदिर देणगी चोरीप्रकरणी चंपतराय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध! ३१ जुलैपर्यंत कलम १६३ लागू

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक पाऊस

उत्तराखंडमध्ये मदरसा बोर्ड बंद…महाराष्ट्रात काय होणार?

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत भारताने अधिकृत प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. एका बाजूला भारताचे अमेरिका आणि इस्रायलशी वाढते संबंध आहेत, तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा सुरक्षा, चाबहार बंदर, आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) आणि प्रादेशिक स्थैर्याच्या दृष्टीने इराणही भारतासाठी महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे भारताच्या संतुलित परराष्ट्र धोरणाचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारातील भारताची उपस्थिती आणि त्यानंतर इराणने व्यक्त केलेली सार्वजनिक कृतज्ञता यामुळे भारत-इराण संबंधांना नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या कथित दबावाच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वतंत्र भूमिका घेतल्याचा संदेशही या घडामोडीतून अधोरेखित होत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा