31 C
Mumbai
Sunday, November 16, 2025
घरदेश दुनियाओमानमध्ये वाईट अवस्थेत सापडलेल्या ३६ कामगारांसाठी धावून गेले पियुष गोयल

ओमानमध्ये वाईट अवस्थेत सापडलेल्या ३६ कामगारांसाठी धावून गेले पियुष गोयल

अटक करण्याची भीती, पासपोर्ट हिसकावले..कामगारांची कहाणी

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि ओमानमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने ओमानमध्ये अडकलेल्या आणि गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या ३६ भारतीय कामगारांची सुटका करण्यात आली. हे सर्व कामगार अलीकडेच भारतात परतले असल्याची माहिती गोयल यांनी मंगळवारी दिली.

गोयल यांच्या कार्यालयानुसार, सप्टेंबरच्या मध्यावर त्यांच्या मतदारसंघातील एका वॉर्ड अध्यक्षाने त्यांच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की ओमानमध्ये १८ भारतीय कामगार त्यांची नियुक्ती करणाऱ्याच्या शोषणाला बळी पडले आहेत आणि अतिशय बिकट परिस्थितीत राहत आहेत. त्यात त्याचा एक नातेवाईकही होता.

ही बाब समजताच गोयल यांनी ओमानमधील भारतीय दूतावासाशी तात्काळ संपर्क साधून मदत मागितली.
दूतावासाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्या १८ कामगारांना शोधून काढले आणि त्याच वेळी आणखी १८ भारतीय कामगार सापडले जे अगदी तशाच परिस्थितीत अडकलेले होते.

गुरुद्वाऱ्यात आश्रय, नंतर भारतात परतावा

सर्व ३६ कामगारांना स्थानिक गुरुद्वाऱ्यात हलविण्यात आले, जिथे त्यांना तात्पुरता आसरा देण्यात आला.
भारतीय दूतावासाने त्यांच्या परतीसाठी लागणारी सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली आणि काही दिवसांतच सर्वांना सुरक्षितपणे भारतात परत आणले.

हे ही वाचा:

टीएमसीची उलटी गिनती सुरू

बूट भिरकावण्याइतपत परिस्थिती का ओढवलीय?

लोकांना ‘एनडीए’च्या विकास धोरणावर विश्वास

धन शोधन प्रकरणात ईडीची कारवाई

कामगारांची व्यथा

हे सर्व कामगार चांगल्या नोकरीच्या शोधात ओमानला गेले होते, पण तिथे त्यांच्यावर मोठा अन्याय झाला. पगार वेळेवर मिळत नव्हता, काही वेळा ४–५ महिन्यांनी अर्धवट पगार दिला जात होता. त्यांना अतिशय अरुंद जागेत ठेवण्यात आले आणि त्यांचे पासपोर्ट काढून घेतले गेले. काहींच्या नावावर कर्जेही काढली गेली. त्यांना नियुक्त करणाऱ्या एजंटने धमकी दिली की त्यांनी पळायचा प्रयत्न केला तर अटक केली जाईल, त्यामुळे ते पूर्णपणे असहाय्य झाले होते.

पीयूष गोयल यांचे वक्तव्य

गोयल यासंदर्भात म्हणाले, “अडचणीत असलेल्या भारतीयांची सेवा करणे ही केवळ जबाबदारी नाही, तर आमच्यासाठी एक पवित्र कर्तव्य आहे. परदेशात काम करणारे आमचे कामगार हे देशाचा अभिमान आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी, सन्मानासाठी आणि गरज पडल्यास त्यांना परत आणण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.” त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी एजंट आणि संभाव्य कंपनी, व्यक्ती यांची प्रामाणिकता तपासावी, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा