29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरधर्म संस्कृती"त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा"

“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”

विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांचे परखड मत

Google News Follow

Related

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाचा प्रयत्न केल्याने गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस यांनीही यावर प्रतिक्रिया देत निषेध केला.

विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी १३ मे रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात चंदन मिरवणूक काढून काही मुस्लिमांनी प्रवेश करण्याच्या धाडसाचा कडाडून विरोध केला आहे. गेल्यावर्षीही मिरवणूक काढून असेच धाडस दाखवण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात मुस्लिमांना प्रवेश बंदी आहे. अशाप्रकारे देशभरातील अनेक मठ मंदिरे हस्तगत करण्यात आली असून इतिहासातही अशा अनेक घटना घडल्या आहेत, असं मिलिंद परांडे म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान

एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार

सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स प्रकरणांचा शिवकुमार यांना फटका?

सहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

त्र्यंबकेश्वर मंदिरावरही कब्जा करण्याचा हा सुनियोजित कट समजावा. अशा सर्व धर्मांधांवर कठोर कारवाई करून मंदिरांची सुरक्षा वाढवली पाहिजे. सजग हिंदू समाज अशा कोणत्याही अतिक्रमणाला आणि मंदिरात प्रवेश करण्याच्या धाडसाचा कडाडून विरोध करेल. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानेही योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे, असे मत मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा