28.7 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरराजकारणआव्हाड, कोकण महाराष्ट्रात आहे, ते दुसऱ्याचे घर नाही!

आव्हाड, कोकण महाराष्ट्रात आहे, ते दुसऱ्याचे घर नाही!

Google News Follow

Related

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी घेतला समाचार

दुसऱ्याच्या घरात?… अहो, आव्हाड कोकण महाराष्ट्रात आहे. ते दुसऱ्याचे घर नाही. राज्याचाच भाग आहे. बोलताना तारतम्य तरी बाळगा. मंत्री आहात. मंत्रालयातला शिपाईसुद्धा अशी चूक करणार नाही, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

आव्हाड यांनी २७ जुलैच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजनासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की, कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ आणि निर्माण झालेली परिस्थिती यामुळे २७ जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची लवकरच घोषणा केली जाईल. दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद मनवावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

आव्हाड यांच्या या ट्विटवर आमदार भातखळकर यांनी खरमरीत टीका केली आहे.

२७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते, पण आता ते पुढे ढकलण्यात आले आहे.

कोकणात पावसामुळे जो हाहा:कार माजला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फारसे गांभीर्य नसल्याची टीका होत आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली तेव्हा सोबत असलेले आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वर्तणुकीवर अवघ्या महाराष्ट्रातून सडकून टीका झाली. मुख्यमंत्र्यांनीही धावता दौरा केल्यामुळे त्याबद्दलही लोकांनी नाराजी प्रकट केली. आता याच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा