34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पावसाचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पावसाचा आढावा

Google News Follow

Related

आज महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जनतेला त्रास होऊ नये याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. पावसाचा पूर्ण आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या आहेत. आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

तसंच यावेळी त्यांनी मुंबईत कुठंही पाणी साचल्याच्या घटना नाहीत असा दावा केला आहे. हिंद माता जिथं पाणी साचत तिथं पाणी साचलेलं नाही. धोकादायक इमारती नागरिकांनी खाली कराव्यात. अशी सूचना त्यांनी नागरिकांना केल्या आहेत. तसंच सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

कोल्हापूरसह कोकणातील विविध भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात आढावा घेण्यात येत असून कोकणात एनडीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुंबईतील काही पूर परिस्थिती वाटत असलेल्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???

‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’

उद्धव ठाकरे यांचे टोमणेबॉम्ब सुरूच!

डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचं कौतुक केले आहे. ते म्हणाले, पालिकेने योग्य नियोजन केल्याने पाणी साचल्याच्या घटना कमी घडल्या आहेत. नेहमीच्या ठिकाणीही पाणी अद्याप साचलं नाही. मुंबईत पाणी साचतं तिथं पालिकेकडून योग्य नियोजन करण्यात आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा