29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणमहाविकास आघाडीमधील असंतोष प्रकर्षाने दिसला!

महाविकास आघाडीमधील असंतोष प्रकर्षाने दिसला!

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येणार हा विश्वास विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दाखवून दिला. १३४ मते भाजपाने मिळविली म्हणजे तब्बल २१ मते महाविकास आघाडीतून फुटली. याचा अर्थ महाविकास आघाडीत असंतोष आहे, असे मत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणूक पार पडल्यावर व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभा निवडणुकीत १२३ मते घेतली होती आता १३४ मते घेतली आहेत. मी सांगत होतो की, महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे. समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणून सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आमदार आमच्या पाचव्या उमेदवाराला मते देतील हा आम्हाला विश्वास होता, ते इथे दिसले.

फडणवीसांनी सांगितले की, पाचव्या उमेदवाराकडे पहिल्या पसंतीचे एकही मत पहिल्या पसंतीचे नव्हते तरी काँग्रेसपेक्षा अधिक मते घेतली. शिवाय, चार उमेदवारांनीही मोठया प्रमाणात मते घेतली. मोठा प्रचंड विजय मिळाला. पुन्हा मला स्मरण केले पाहिजे, माझे सहकारी लक्ष्मण जगताप, मुक्ताताई टिळक यांनी या परिस्थितीतही हातभार लावला. त्यांचे आभार. नरेंद्र मोदी ज्या प्रकारे भारताचा विकास करत आहेत आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. या निवडणुकीने महाराष्ट्रात नव्या परिवर्तनाची नांदी दिसते आहे. कुठेतरी सरकारच्या संदर्भातील असंतोष बाहेर आला आहे. पण आमचा संघर्ष असाच सुरू आहे. लोकाभिमुख सरकार आणल्यावर हा संघर्ष संपेल.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीची २१ मते फुटली; ठाकरे सरकारमध्ये खळबळ

अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मक्कीला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करणाऱ्या प्रस्तावावर चीनचा खोडा

धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

 

महाराष्ट्र मोदींजीसोबत आहे. चमत्कार मी मानत नाही. याठिकाणी हा असंतोष आहे तो मतांमध्ये परिवर्तित झाला. असंतोष वाढत राहिला तर काय होईल हे दाखवले आहे या निकालांनी मला यापेक्षा अधिक काही बोलायचे नाही. तुम्हाला किती फुटलेली मते दिसतात हे कयास आहेत याठिकाणी जी सत्तेत आहे ते आम्हाला माहीत आहे. सगळ्या पक्षातील त्या आमदारांचे आभार मानतो ज्यांनी मदत केली आणि उमेदवार निवडून आणले. आमचा संघर्ष जनतेकरता आहे सत्तेकरता नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा