35 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणआसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी आसाम सरकारशी अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. आसाममध्ये महाराष्ट्र भवन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील संत यांचे सांस्कृतिक दालन उभे करणार आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी विमानतळावरून दिली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि तेथील मराठी आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. या बैठ्कीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणाले, आसाममध्ये महाराष्ट्र भवन व्हावं अशी मागणी केली होती. त्याला आसाम सरकारने परवानगी दिली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे संत यांचे सांस्कृतिक दालनसुद्धा आसाममध्ये होण्यास परवानगी मिळाली आहे. याशिवाय आसाम भवन नवी मुंबईमध्ये होणार असल्याचीही माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. काल बुलढाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी तेच तेच रडगाणं जनतेसमोर मांडलं. शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे नैराश्येचा सामना करत आहेत. त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांनाही कळत नाही. खोके सरकार म्हणतात, मग त्यांनी फ्रिज भरून जे खोके घेतले ते गेले कुठे? फ्रिज भरून नाही तर त्यांनी कंटेनर भरून त्यांनी खोके घेतले असं गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच या खोक्यांचा हिशोब लवकरच जनतेसमोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा :

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!

शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!

एकदिवसीय गुवाहाटी दौरा उत्तम झाला हेही त्यांनी सांगितलं. तसेच आसाममध्ये त्यांचे स्वागतही जंगी झाले. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आसामच्या जनतेचे, सरकार आणि पोलिसांचे आभार मानले आहेत व मुंबईला रवाना झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा