31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणअकबर, औरंगजेबाच्या या औलादींना सांगितले पाहिजे!

अकबर, औरंगजेबाच्या या औलादींना सांगितले पाहिजे!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून काँग्रेस, इंडी आघाडीवर जोरदार टीका

Google News Follow

Related

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज उत्तर प्रदेशाच्या शाहजहाँपुरमध्ये सभा पार पडली.शाहजहाँपुर मधून भाजपचे उमेदवार अरुण कुमार सागर यांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री योगींनी सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, अकबर आणि औरंगजेबाच्या या औलादींना सांगितले पाहिजे की हा नवा भारत आहे, राष्ट्रनायकांचा अपमान हा नवा भारत स्वीकार करणार नाही.

सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, एकीकडे राष्ट्रनायकांचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे तर दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टीची इंडी आघाडी त्याच्या विरुद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीने मैनपुरीमध्ये राष्ट्रनायक महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.समाजवादी पार्टीचे गुंड मूर्तीवर चढतात आणि महाराणा प्रतापांच्या भाल्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न करतात, शिवीगाळ करतात.ते पुढे म्हणाले, या अशा अकबर आणि औरंगजेबाच्या या औलादींना सांगितले पाहिजे की, हा नवा भारत आहे आणि या नव्या भारत राष्ट्रनायकांचा अपमान स्वीकार केला जात नाही.

हे ही वाचा:

जड झाले ओझे…

सायबर फ्रॉड पुनीत कुमारच्या आईच्या लॉकरमध्ये सोन्याचं घबाड!

‘दीपस्तंभ’ला समाजसेवेच्या कार्याची पोचपावती मिळाली!

मंगेशकर कुटूंब भाऊ तोरसेकरांना ऐकते तेव्हा…

निवडणुकीच्या काळात अशा गुंडांची गर्मी वाढते.पंरतु जस-जसे निवडणुकीचे निकाल समोर येतील तेव्हा या गुंडांची गुर्मी हळूहळू कमी होऊन जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा