काँग्रेसला गांधी-नेहरु खानदान देशापेक्षा मोठे आहे. अनेकदा आपल्या उक्ती-कृतीतून काँग्रेस नेते हे दाखवत असतात. चांद्रयान-३ च्या यशामुळे काँग्रेस नेते बावचळले आहेत. एका बाजूला या मोहीमेचे श्रेय त्यांना हवे आहे, दुसऱ्या बाजूला त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुखही घ्यायचे आहे. त्यातूनच काँग्रेसचे मोडीत काढण्यात आलेले नेते राशीद आल्वी यांनी शिवशक्तीचा अपमान केला आहे.