उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी तीन सर्कलमध्ये क्षेत्राधिकारी (सीओ) स्तरावर बदल करत नव्या अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभल सर्कलचे प्रभारी सीओ अनुज चौधरी यांची बदली करून त्यांना चंदौसी सर्कलची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आयपीएस अधिकारी आलोक भाटी यांना संभल सर्कलचा नवा सीओ म्हणून नेमण्यात आले आहे. सीओ चौधरी सध्या काही काळापूर्वी होळी-जुम्मा संदर्भात दिलेल्या विवादित वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.
इतर बदलांमध्ये, आलोक सिद्धू यांना बहजोई सर्कलचा नवा प्रभारी बनवण्यात आले आहे. या सर्कलचे माजी सीओ डॉ. प्रदीप कुमार यांच्याकडे आता सीओ ट्रॅफिकची जबाबदारी असेल. तर, सध्या ट्रॅफिक सीओ असलेले संतोष कुमार सिंह यांना यूपी डायल ११२ चे प्रभारी बनवण्यात आले आहे. या बदलांचा उद्देश जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत, कार्यक्षम आणि उत्तरदायी बनवण्याचा आहे, असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा..
काँग्रेस वर्किंग कमिटी आता पीडब्ल्यूसी झाली
“स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार…” कर्नाटकच्या मंत्र्यांनी का केले असे विधान?
प्रियंगु : आयुर्वेदातील असे औषध ते पोटापासून त्वचेपर्यंत सर्व रोगांवर उपयुक्त
होळीपूर्वी सीओ अनुज चौधरी यांनी एक वक्तव्य करत सांगितले होते की, “होळीच्या दिवशी रंगांमुळे अस्वस्थता वाटणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये.” त्यांनी असेही म्हटले होते की, “यंदा होळी शुक्रवारच्या दिवशी आहे आणि त्याच दिवशी जुम्म्याची नमाज देखील आहे. होळी हा सण वर्षातून एकदाच येतो, तर शुक्रवारची नमाज वर्षात ५२ वेळा येते.” त्यांच्या या विधानावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी चौधरी यांच्यावर निशाणा साधत योगी सरकारवर टीका केली होती. याबाबत चौधरी यांच्यावर चौकशी झाली आणि त्यांना क्लीनचिट मिळाली होती. मात्र, माजी आयपीएस अमिताभ ठाकुर यांच्या तक्रारीवरून ही फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे.