गुगलने कंपनीच्या वार्षिक जाहिरात सुरक्षा अहवालानुसार, डिजिटल जाहिरात परिसंस्था स्वच्छ आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जाहिरातदारांच्या खात्यांसह अनेक जाहिराती गुगलने काढून टाकल्या आहेत. गुगलने २०२४ मध्ये भारतातील २९ लाख जाहिरातदारांची खाती निलंबित केली आहेत. शिवाय अहवालातील आकडेवारीनुसार, २४७.४ दशलक्ष जाहिराती काढून टाकल्या आहेत, असे कंपनीने बुधवारी एका अहवालात म्हटले आहे.
जागतिक स्तरावर, गुगलने ३९.२ दशलक्षाहून अधिक जाहिरातदार खाती निलंबित केली आहेत. ५.१ अब्ज जाहिराती काढून टाकल्या आहेत आणि ९.१ अब्जाहून अधिक जाहिरातींवर मर्यादा आणल्या, असे कंपनीने त्यांच्या वार्षिक जाहिरात सुरक्षा अहवालात म्हटले आहे. शिवाय भारतासंबंधीची आकडेवारी पाहता भारतातील, २४७.४ दशलक्ष जाहिराती काढून टाकण्यात आल्या आणि २९ लाख जाहिरातदार खाती निलंबित करण्यात आली आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
धोरण उल्लंघनांच्या यादीत आघाडीवर वित्तीय सेवांशी संबंधित जाहिराती होत्या. त्यानंतर ट्रेडमार्क उल्लंघन, जाहिरात नेटवर्कचा गैरवापर, वैयक्तिकृत जाहिरातींचा गैरवापर आणि जुगारसारखे खेळ यांचा समावेश होता. भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेत ऑनलाइन आर्थिक घोटाळे आणि ब्रँड गैरवापराबद्दल वाढती चिंता या आकडेवारीतून अधोरेखित झाली आहे. गुगलच्या धोरणांमध्ये वापरकर्त्यांसाठी हानिकारक किंवा एकूण जाहिरात अनुभवात अडथळा आणणारा कंटेंट प्रतिबंधित केला आहे. भारतात, जिथे इंटरनेटचा वापर वाढत आहे आणि डिजिटल जाहिरातींवर खर्च वाढत आहे, तिथे कंपनी म्हणते की ते विकसित होत असलेल्या गैरवापराच्या युक्त्यांना तोंड देण्यासाठी त्यांचे प्रयत्न दुप्पट करत आहे.
हे ही वाचा..
अमरावतीचे न्यायमूर्ती बीआर गवई होणार पुढील सरन्यायाधीश!
‘कोच, मी खेळेन’ – आणि त्या एका वाक्यानं सगळं बदललं!
दर्गा तोडल्यानंतर झालेल्या दगडफेकीत २१ पोलिसांचे हातपाय मोडले
नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला कायद्याचा सामना करावा लागेल
कंपनीने म्हटले आहे की १०० हून अधिक तज्ञांची एक टीम एकत्रित झाली आणि त्यांनी घोटाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातदारांना निलंबित करण्यासाठी चुकीचे सादरीकरण धोरण अद्यतनित करणे यासारख्या उपाययोजना विकसित केल्या, ज्यामुळे ७,००,००० हून अधिक आक्षेपार्ह जाहिरातदार खाती कायमची निलंबित करण्यात आली. यामुळे गेल्या वर्षी अशा प्रकारच्या घोटाळ्याच्या जाहिरातींच्या अहवालात ९० टक्के घट झाली, असे म्हटले आहे.