30 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरविशेष“भारताची प्रतिक्रिया दहशतवाद विरोधात ठाम आणि अचूक!”

“भारताची प्रतिक्रिया दहशतवाद विरोधात ठाम आणि अचूक!”

‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याने जारी केला व्हिडिओ

Google News Follow

Related

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून कारवाई केली आणि दहशतवादाचे कंबरडे मोडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने केलेल्या या कारवाईत भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या कारवाईची वर्षपूर्ती झाली असून यानिमित्त सैन्याने व्हिडीओ जारी केला आहे.

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवण्यात आली होती. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांची निर्घृण हत्या केली होती. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी)शी संबंधित ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “भारताची प्रतिक्रिया ठाम, मोजून-मापून आणि अचूक होती. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचे आणि नागरिकांच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” सैन्याने पुढे म्हटले, “न्याय मिळाला आहे. जय हिंद.” या निमित्ताने भारतीय सैन्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये पहलगाम हल्ल्यापासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना दिलेला कठोर इशाराही समाविष्ट आहे. या नरसंहारानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “भारत प्रत्येक दहशतवाद्याची आणि त्याच्या मदतगारांची ओळख पटवेल, त्यांचा शोध घेईल आणि त्यांना शिक्षा करेल.”

व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींचा आणखी एक संदेशही दाखवण्यात आला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते, “दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाहीत. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.” या विधानातून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट झाली होती. दरम्यान, या लष्करी मोहिमेच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय संरक्षण दलाच्या मुख्यालयानेही ‘एक्स’वर पोस्ट करत ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘राष्ट्रीय संकल्पाचे प्रतीक’ असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

हवाई दल ते स्वीय सहाय्यक… कोण होते सुवेंदू अधिकारी यांचे पीए?

सायबर गुन्ह्यांसाठी भारतीयांची तस्करी प्रकरणी नऊ ठिकाणी छापे

कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर ९ मे रोजी शपथविधी

‘सपा’ने आय पॅकला सांगितले बॅग पॅक करायला!

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून लक्ष्य केले होते. गैर-मुस्लिमांची ओळख पटवण्यासाठी पीडितांना जबरदस्तीने इस्लामी ‘कलमा’ म्हणण्यास भाग पाडण्यात आले होते. मृतांमध्ये २५ पर्यटक आणि पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक स्थानिक घोडेवाला यांचा समावेश होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ६ आणि ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. भारताच्या लष्करी आणि रणनीतिक क्षमतेचे हे महत्त्वपूर्ण प्रदर्शन मानले गेले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा