27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषसंपूर्ण जगात भारताचा डंका

संपूर्ण जगात भारताचा डंका

Google News Follow

Related

दक्षिण कोरियामध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या ११ वर्षांची पूर्तता झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रवाशांनी भारताच्या वाढत्या व्यावसायिक क्षमतेचे आणि जगभरातील देशांशी दृढ होत चाललेल्या संबंधांचे कौतुक केले. भाजपा-एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर एका प्रवासी भारतीय महिलेनं सांगितलं, “आज कोणत्याही भारतीयाला आपली ओळख करून देण्याची गरज उरलेली नाही, भारताचं नाव आता संपूर्ण जगभर गाजत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जागतिक पातळीवर भारताची ओळख अधिक ठामपणे निर्माण झाली आहे. आपण शांततेचे प्रतीक आहोत, पण गरज पडल्यास असामान्य शौर्यही दाखवू शकतो.

त्यानं असंही म्हटलं की, गेल्या काही वर्षांत जगाने भारतीय लष्कराच्या शौर्याला अनुभवले आहे – मग ते बालाकोट असो, उरी असो किंवा अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’. आमच्या सेनेनं आपले पराक्रम दाखवले आहेत. “मी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानते, की त्यांनी जगभरातील देशांमध्ये प्रतिनिधीमंडळ पाठवले आणि भारताची बाजू मांडली, तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. दुसऱ्या एका प्रवासी महिलेनं सांगितलं, “गेल्या ११ वर्षांत भारताची आश्चर्यकारक वाटचाल झाली आहे – जी-२० अध्यक्षपदापासून ते चांद्रयान-३ च्या अंतराळ मोहिमेपर्यंत, आणि यूपीआयसारख्या डिजिटल नवकल्पनांपर्यंत. आम्ही एनआरआय मंडळींनी जागतिक व्यासपीठावर भारताच्या या उत्कर्षाचा अभिमानाने साक्षीदार झालो आहोत. ही प्रगती केवळ आरोग्यसेवा आणि स्वच्छतेपुरती मर्यादित नाही, तर हवामान कृतीपासून तांत्रिक प्रगतीपर्यंत भारताने जगाला दाखवून दिले आहे की तो काय करू शकतो.

हेही वाचा..

‘ऑपरेशन सिंदूर’च्या नायकाचा कसा केला इंडिगोने गौरव

दक्षिण कोरियन लष्कराने उत्तर कोरियाविरोधातील काय केले बघा  

दिग्विजय सिंह यांच्या भावाला काँग्रेसने केले निलंबित

चिनाब रेल्वे पूलाच्या संरचनेच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका कोणाची ?

एका भारतीय प्रवाशाने सांगितले, “आम्ही सर्वजण स्पष्टपणे पाहू शकतो की भारतामध्ये किती मोठी प्रगती झाली आहे. प्रत्येकजण बदल पाहतो आहे, विशेषतः कोरियन लोक, जे काही वर्षांपूर्वी भारतात आले होते आणि आता पुन्हा आले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, बदल लक्षणीय आहेत. आम्ही अनेकदा पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि एकंदर विकास यामधील फरकावर चर्चा करतो. कोरियन उद्योजक ह्यून ही चोई यांनी भारताच्या वाढत्या व्यावसायिक क्षमतेचे आणि सुधारत चाललेल्या द्विपक्षीय संबंधांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांत भारतामध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. २० वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यांची स्थिती आजच्या तुलनेत खूपच मागे होती. त्याकाळी मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मर्यादित होता आणि परकीय गुंतवणूकही कमी होती. परंतु भाजपा सरकारच्या गेल्या ११ वर्षांत, विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा