७ मे रोजी मध्यरात्री भारताने सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. ८ मे रोजी पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने हाणून पाडला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आणि शेजारील देशाची HQ-९ हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. याशिवाय पाकिस्तानातील लाहोर आणि रावळपिंडीसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले आहेत.
लाहोरमधील सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना, राजदूतांना आणि अधिकाऱ्यांना जारी केलेल्या सूचनांमध्ये लाहोर आणि पंजाब प्रांत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेने आपल्या नागरिकांना शहर सोडण्यास किंवा सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.
“ड्रोन स्फोट, पाडलेले ड्रोन आणि लाहोर आणि आसपासच्या परिसरात संभाव्य हवाई हल्ल्यांमुळे अमेरिकेने पाकिस्तानच्या लाहोरमधील आपल्या सर्व वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. “सक्रिय संघर्षाच्या क्षेत्रात” सापडलेल्या अमेरिकन नागरिकांना सुरक्षितपणे शक्य असल्यास तेथून निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर ते निघून जाणे सुरक्षित नसेल तर त्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, असे अमेरिकेने लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आपल्या नागरिकांना सांगितले.
हे ही वाचा :
भारताच्या ड्रोन हल्ल्यात लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!
रावळपिंडी स्टेडियमवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीती
भारतातील १५ शहरांवर हल्ले करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले! सगळी क्षेपणास्त्रे केली निष्प्रभ
गृहमंत्री अमित शाह यांचा झारखंड दौरा रद्द
दरम्यान, ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या १५ शहरांवर हल्ला करण्यासाठी अनेक क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच पाडली.