कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस चालकावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने जोर धरला आहे. महाराष्ट्र सरकारने यावर मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बस चालकावर हल्ला प्रकरणी महाराष्ट्रातील अनेक भागात बस चालकांकडून निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेत शनिवारी (२२ फेब्रुवारी) कर्नाटकला जाणारी राज्य परिवहन बस सेवा बंद करण्याचे आदेश दिले.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, कर्नाटकातील चित्रदुर्गात कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी बेंगळुरूहून मुंबईला येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसवर हल्ला केला. कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी चालक भास्कर जाधव यांच्या चेहऱ्याला काळे फासले आणि त्यांच्यावर हल्ला केला. ते पुढे म्हणाले, कर्नाटक सरकार या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत बस सेवा पुन्हा सुरू केली जाणार नाही. आम्ही मंत्री पूर्वी शिवसैनिक आहोत, हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीत, असा कानडी संघटनांना इशाराही त्यांनी दिला.
हे ही वाचा :
‘छावा’ चित्रपटाने औरंगजेबाच्या कबरीलाच आव्हान दिलंय !
पवारांच्या ‘त्या’ कर्तृत्त्वाचा सूत्रधार कोण होता ?
विदेशी बायकोचे उपद्व्याप, गोगोईंच्या डोक्याला ताप?
तेलंगणामध्ये बोगद्याचा भाग कोसळून अपघात; सहा मजूर अडकले
दरम्यान, महाराष्ट्र सरकारी बसच्या चालकाला मारहाण करण्याचे प्रकरण वेगाने वाढत आहे आणि महाराष्ट्र सरकारही या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की जोपर्यंत कर्नाटक सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत हा मुद्दा तापतच राहील. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकला प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.