30 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषमणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली

मणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली

वाहने जाळली, फायली जळून राख, मणिपूरमध्ये मंत्र्यांच्या घराला आग

Google News Follow

Related

मणिपूरमधील संघर्ष अजूनही निवळलेला नाही. राज्यात ठिकठिकाणी संघर्ष सुरूच आहे. त्यात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या इंफाळ शहरातील घराची तोडफोड जमावाने केली आणि ते जाळण्याचा प्रयत्नही केला.

मणिपूरमध्ये ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ हिंसाचाराने ग्रासले आहे. द्वेषाची धग अजूनही पेटते आहे. या अशांततेमुळे आतापर्यंत १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० हजारांहून अधिक घरे पेटली आहेत. हजारो रहिवाशांना भीतीपोटी घरे सोडावी लागली आहेत. या गोंधळात गुरुवारी रात्री भर पडली. जमावाच्या एका गटाने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आर. के. रंजन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करून आग लावली. पेटते घर, जळालेली वाहने, जळलेल्या फायली आणि धुराने माखलेल्या भिंतींचे दृश्य पाहून विध्वंसाचे उग्र रूप दिसत होते.

 

हिंसक जमावाने दिसेल त्या वस्तूंना लक्ष्य केले. मग ती वाहने असोत किंवा धान्याची पोती – सर्व काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरात कोणीही नसताना हा हल्ला झाला. जमावाने पेट्रोल बॉम्ब फेकले आणि घराला आग लावली, त्यामुळे पुस्तके आणि फाईल्स जळून खाक झाल्या. या अर्धवट जळलेल्या पुस्तकांभोवती धुराचे वातावरण अजूनही कायम आहे. हिंसाचाराच्या खुणा तुटलेल्या खिडक्यांच्या काचांवर दिसतात.

 

स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे एक हजार लोकांच्या जमावाने मंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. घटनेच्या वेळी कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते, परंतु सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर होते. तथापि, जमावाने ही सुरक्षा कुचकामी ठरवली. या घटनेबद्दल आर. के. रंजन सिंह यांनीही आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. ‘मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. ते ३मे पासून (जेव्हा राज्यात जातीय संघर्ष सुरू झाला) ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि हिंसाचार संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत,’ असे त्यांनी नमूद केले. हा संघर्ष दोन समुदायांमधील गैरसमजांमुळे होत आहे, हे त्यांनी सांगितले. ‘याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मी हिंदू आहे. हल्लेखोरही हिंदूच होते. त्यामुळे हा धार्मिक मुद्दा नसून हिंसाचार आहे,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

पळवून नेलेल्या हिंदू तरुणीचा ‘निकाह’ पोलिसांनी रोखला

मदरशात शिक्षण घेण्यासाठी बिहारमधून आलेल्या मुलांना परत पाठवले!

अनधिकृत दर्गा हटविण्याच्या नोटिशीनंतर मुस्लिमांची पोलिसांवर दगडफेक

इंग्लंडचा आक्रमक खेळ; पहिल्याच दिवशी ३९३ धावांवर डाव घोषित

सरकारने शांतता समिती स्थापन केली असून त्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सरकार सर्व समुदायांशी संवाद साधेल आणि पुढे मार्ग काढेल. परिस्थिती तणावपूर्ण राहिल्याने मणिपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. अधिकारी अशांततेची मूळ कारणे दूर करण्यासाठी आणि प्रदेशातील सर्व रहिवाशांची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा