27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषमोदींच्या विचारांनी ग्रामीण प्रतिभेला मिळाला सन्मान

मोदींच्या विचारांनी ग्रामीण प्रतिभेला मिळाला सन्मान

आयुष्मान योजनेमुळे झाला लाभ : पद्मश्री डॉ. योगी ऐरन

Google News Follow

Related

८४ वर्षीय पद्मश्री पुरस्कार विजेते आणि प्लास्टिक सर्जन डॉ. योगी ऐरन यांनी आपले जीवनानुभव शेअर करत केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरून स्तुती केली. डॉ. ऐरन म्हणाले, “पूर्वी पद्मश्रीसारखे मोठे पुरस्कार केवळ व्हीव्हीआयपींनाच मिळायचे, पण आता ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्यांना, ज्यांनी आपल्या मेहनतीने अशक्य गोष्टी शक्य केल्या, त्यांनाही सन्मान दिला जातो. मी कधीच विचार केला नव्हता की मला पद्मश्री मिळेल. जेव्हा ही बातमी मिळाली, तेव्हा विश्वासच बसला नाही. हे सर्व मोदींच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे शक्य झालं.”

ते पुढे म्हणाले, “मोदींची विचारसरणी आणि दृष्टीकोन संपूर्णपणे वेगळा आहे. ते केवळ व्हीव्हीआयपींसोबत नाही, तर सामान्य जनतेच्या सोबतही आहेत. मोठ्या लोकांना आणखी उंचीवर नेण्यात काही अर्थ नाही, पण छोट्या स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्यांना सन्मान देणे हे खरं बदल घडवणं आहे. या सन्मानामुळे मला अजून चांगलं काम करायला प्रेरणा मिळाली. पद्मश्री मिळाल्यानंतर माझ्यात एक नवीन उर्जा आली. जर मोदी पुढची १०-२० वर्षं पंतप्रधान राहिले, तर देश फार पुढे जाईल.”

हेही वाचा..

आयईडी स्फोटात अ‍ॅडिशनल एसपी आकाश राव गिरिपुंजे हुतात्मा

११ वर्षांमध्ये देशवासियांच्या आशांना नवे पंख मिळाले

‘दलाल’ फेम दिग्दर्शक पार्थो घोष यांचे निधन

हरल्यानंतर राहुल गांधींचं बिनसत

आपल्या करिअरबाबत बोलताना डॉ. ऐरन म्हणाले की, जेव्हा त्यांनी प्लास्टिक सर्जरी सुरू केली, तेव्हा ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते, पण एक उत्कृष्ट कलाकार नक्कीच होते. “प्लास्टिक सर्जरी ही एक कला आहे, आणि म्हणूनच मी यामध्ये यशस्वी झालो.” ते म्हणाले, “पूर्वी लोक विचारायचे, ‘प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिक कुठे आहे?’ पण आता जनजागृती वाढली आहे. लोकांना माहीत आहे की हाताला इजा झाल्यास किंवा इतर समस्या असल्यास कुठे जावे. याचे श्रेय सरकारच्या योजना, विशेषतः आयुष्मान भारत योजनेला जाते.”

कोरोना लसीकरणाचा दाखला देत ते म्हणाले, “पूर्वी पोलिओच्या लसीपासून लोक घाबरायचे, पण कोरोना काळात लोकांनी लसी खुल्या मनाने घेतल्या. ही जनजागृतीचीच निशाणी आहे.” डॉ. ऐरन यांनी आपल्या ८४ वर्षांच्या जीवनात देशातले बदल जवळून पाहिले आहेत. “पूर्वी लोकांकडे कपडेही नसायचे, लाखो लोकांसाठी एक डॉक्टर असायचा. पण आज अनेक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा सुधारल्या आहेत.” ते म्हणाले, “जेव्हा मी देहरादूनला आलो, तेव्हा दिल्लीपर्यंत कुठेही प्लास्टिक सर्जन नव्हता. पण आता अनेक सर्जन आहेत. ही मोदींची करामत आहे की प्रत्येक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत.”

आयुष्मान भारत योजनेची स्तुती करताना ते म्हणाले: “माझं कुटुंब अमेरिकेत राहतं, पण तिथेदेखील अशी योजना नाही. आयुष्मानमुळे गरीबातला गरीब माणूस सुरक्षित वाटतो. पूर्वी गरीब माणूस मोठ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नव्हता, पण आता तो चांगलं उपचार घेऊ शकतो. सरकार हे सुनिश्चित करत आहे की कोणालाही आरोग्याच्या बाबतीत अडचण येऊ नये.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा