पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय आणि लपलेले असल्याचे ठोस संकेत मिळत असल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी केला आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, तपासावर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, या प्रदेशात अजूनही आणखी दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यादरम्यान सुरक्षा दलांनी जलद प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केल्यास कव्हर-फायर देण्यासाठी आणखी दहशतवादी अंतर राखून उपस्थित राहिले असतील. त्यामुळे याठिकाणी आणखी काही दहशतवादी लपून बसले असतील, अशी शंका आहे.
सूत्रांनी पुढे सांगितले की, हल्लेखोर हे अत्यंत स्वावलंबी आहेत, त्यांच्याकडे अन्न पुरवठा आणि इतर आवश्यक वस्तू आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरच्या गोष्टींची गरज नाहीये आणि त्यामुळे ते दीर्घकाळ जंगलामध्ये प्रवास करत आहेत.
हे ही वाचा :
सशस्त्र दलांचे मनोबल खच्ची करू नका! सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले
प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव ठेवा
अमृतसर: पाकिस्तानी सीमेवर बीएसएफकडून ५ हँडग्रेनेड, ३ पिस्तूलांसह अनेक शस्त्रे जप्त!
पहलगाममध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते दाखल
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत आहे. हल्ल्यासंदर्भात काही पुरावे पथकाच्या हाती लागल्याची माहिती आहे. पथकाकडून वेगवेगळ्या बाजूने तपास केला जात आहे. याच दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पोहोचले आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणाला ते भेट देणार आहेत. तसेच हल्ल्यासंदर्भात संपूर्ण माहिती ते घेणार आहेत.