पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान सरकार आणि लष्करात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, भारताच्या सलग कारवाईमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. पाकिस्तानच्या शेअर बाजारातही प्रचंड घसरण झाली आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि त्यामुळे ट्रेडिंग थांबवावी लागली.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. कराची स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक KSE-100 इंडेक्स २२ एप्रिलपासून सुमारे १३ टक्के घसरला आहे. २२ एप्रिलला KSE-१०० इंडेक्स १,१८,४३० होता, जो आता घसरून १,०३,०६० वर पोहोचला आहे. याशिवाय, KSE-३० इंडेक्समध्येही आतापर्यंत १४.३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
हेही वाचा..
सेनाप्रमुखांनी लान्स नायक दिनेश कुमार यांच्या शौर्याला दिली सलामी
पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला केले ठार
“कसोटी सिंहासन रिकामं – गिल की बुमराह?”
“शेवटच्या दोन चेंडूंमध्ये धोनीने गाजवली बाजी!”
पाकिस्तानचा शेअर बाजार देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे चित्र दाखवत आहे. सध्या पाकिस्तानकडे केवळ १५ अब्ज डॉलर्सचा विदेशी चलन साठा आहे आणि देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तान आपली जीडीपी चालवण्यासाठी IMFकडून कर्ज मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आतंकी हल्ल्यानंतर भारत फक्त लष्करी नव्हे तर अन्य स्तरांवरही कारवाई करत आहे. त्यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्याचाही समावेश आहे, ज्यामुळे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसू शकतो.
अहवालानुसार, हा करार रद्द केल्यास पाकिस्तानमधील अनेक उद्योगांना पाण्याची टंचाई जाणवू शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानवर मोठी लष्करी कारवाई केली. यात ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतीय सेनेच्या शौर्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.