27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषराहुल गांधींनी राजकारणापासून दूर राहावे

राहुल गांधींनी राजकारणापासून दूर राहावे

निवृत्त मेजर जनरल हर्ष कक्कड यांचे मत

Google News Follow

Related

पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल देशभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यावरून निवृत्त मेजर जनरल हर्ष कक्कड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधींच्या या वक्तव्याला राजकीय हेतूप्रेरित असे म्हटले आहे.

मेजर जनरल हर्ष कक्कड म्हणाले, “डीजीएमओने जे वक्तव्य दिलं तेच सत्य आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आधी कुठलाही संवाद झाला नव्हता, हे सर्वांनाच माहिती आहे. भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानला कळवण्यात आलं की फक्त दहशतवाद्यांचेच तळ नष्ट करण्यात आले आहेत. याच गोष्टीचा विपर्यास करून ती जनतेसमोर मांडणं लष्कराचा अपमान आहे. म्हणून मला वाटलं की या विषयावर मी मत मांडणं आवश्यक आहे.

हेही वाचा..

नवनीत राणा यांनी पाकिस्तानला काय दिला इशारा

‘हेरा फेरी ३ ’च्या निर्मात्यांसोबत परेश रावल यांचा वाद?

बसपाच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी आकाश आनंद

हैदराबाद आग : राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला शोक

ते पुढे म्हणाले, जेव्हा देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा विषय येतो, तेव्हा सर्वाधिक योग्य आणि सक्षम व्यक्तीचीच निवड झाली पाहिजे. यात राजकीय पक्षाचा किंवा विचारसरणीचा काही संबंध नसतो. सरकार जेव्हा एखाद्याची निवड करतं, तेव्हा ‘राष्ट्र प्रथम’ या तत्वज्ञानाला प्राधान्य दिलं जातं. प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यात राष्ट्रवाद आणि राष्ट्रनिष्ठा असणं आवश्यक आहे. राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्य दाखवण्यात आले आहे. राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणं म्हणजे गुन्हा आहे.

या वक्तव्यानंतर राहुल गांधींना मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक नवीन व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. पश्चिम कमान कडून जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका जवानाने सांगितलं, “या मोहिमेची सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून झाली, हा फक्त राग नव्हता, हा जणू ज्वालामुखीचा उद्रेक होता.” जवानाने पुढे म्हटलं, डोक्यात फक्त एकच विचार होता – यावेळी असा प्रत्युत्तर दिलं पाहिजे की त्यांची पिढ्यान् पिढ्या लक्षात ठेवतील. ही बदला घेण्याची भावना नव्हती, तर न्याय होता. ९ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजता शत्रूच्या फोर्सने सीजफायरचं उल्लंघन केलं. भारतीय लष्कराने त्यांच्या सर्व पोस्ट्स जमीनदोस्त केल्या. जवानाने सांगितलं की, शत्रू आपली ठाणी सोडून पळताना दिसले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा