30 C
Mumbai
Friday, May 16, 2025
घरविशेषराहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणातून वाचू शकणार नाहीत

राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणातून वाचू शकणार नाहीत

Google News Follow

Related

भाजप नेते संबित पात्रा यांनी सोमवारी आयजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर आरोप केला की त्यांनी अमेरिकेत जाऊन भारताचा अपमान केला आहे. संबित पात्रा म्हणाले की, “राहुल गांधी परदेशी भूमीवर जाऊन भारताची बदनामी करतात, जे ते गेल्या अनेक दशकांपासून करत आले आहेत. अमेरिकेत त्यांनी भारताचा अपमान केला आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आता ‘चोर मचाए शोर’ या शैलीत देशभर पत्रकार परिषदांचे आयोजन करून आई आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधींना त्यांच्या चार्जशीटमध्ये नामांकित केले आहे आणि त्यांच्याविरोधात न्यायालयात कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस देशात अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा..

चारधाम यात्रेसाठी १९ लाखांहून अधिक भाविकांनी केली नोंदणी

७० हजारांचे हेल्मेट अन् १२ लाखांची स्पोर्ट्स बाईक, उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू; काय घडलं नेमकं?

महिलांच्या अनेक समस्यांवर उपाय ‘अशोक वृक्ष’

मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या १० दिवसांनंतर शाळा उघडल्या!

संबित पात्रा म्हणाले, “राहुल गांधी आणि त्यांच्या आईला २०१८ मध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात 50 हजारांच्या जामिनावर सोडण्यात आले होते. जामिनानंतर त्यांनी जल्लोष केला होता. हा भ्रष्टाचाराचा उत्सव होता. ते पुढे म्हणाले, “या प्रकरणात फसव्या जाहिरातींमधून ३८ कोटी रुपये, फसव्या देणग्यांमधून १८ कोटी रुपये मिळवण्यात आले. परंतु यामध्ये कोणत्याही देणगीदारांची यादी नव्हती. भाडे, व्यवसाय योजना या सगळ्या बोगस होत्या. ही संपूर्ण योजना आई-मुलाच्या नियंत्रणात होती.”

ईडीच्या म्हणण्यानुसार, ९८८ कोटी रुपयांचा बनावट निधी शेवटी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या खिशात गेला. ते जर असा विचार करत असतील की ते वाचतील, तर ते त्यांच्या भ्रमात आहेत. “कायद्याचे हात लांब असतात, ते यापासून सुटणार नाहीत.” पात्रा म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त ९९ जागा मिळाल्या. तरीसुद्धा काँग्रेसने जश्न साजरा केला आणि भाजपचा पराभव झाला असे म्हणाले. मग असा प्रश्न उपस्थित होतो की, “निवडणूक आयोगाने काँग्रेसशी संधान केले का?” त्यांनी अयोध्येतील विजयाचाही जश्न साजरा केला, मग ते कसे शक्य झाले? “कारण भारतात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतात.”

राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारताच्या निवडणूक आयोगावर आणि निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली. त्यांनी ब्राउन विद्यापीठात बोलताना म्हटले की, “महाराष्ट्रातील निवडणूक फसवणूक होती आणि निवडणूक आयोग विश्वासार्ह नाही.” यावर पात्रांनी विचारले की, “झारखंडमधील निवडणूक त्याच वेळी झाली होती, तर राहुल गांधी आणि हेमंत सोरेन यांनी तेव्हाही आयोगाशी सौदा केला का? शेवटी पात्रा म्हणाले की, काँग्रेसचे ईडीविषयीचे रागाचे तीव्र प्रतिबिंब निवडणूक आयोगावर दिसत आहे. पण या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण ईडीसारख्या संस्था फक्त तथ्यांच्या आधारावर कार्य करतात, आणि हे प्रकरण पूर्णपणे उघड आहे. सोनिया-राहुल गांधी “गुन्हेगारी उत्पन्नासह पकडले जातील आणि त्यांना क्षमा मिळणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा