पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित १७ व्या सिव्हिल सर्व्हिस डे कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी अनेक अधिकाऱ्यांना सन्मानितही केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आज आपण ज्या धोरणांवर काम करत आहोत, जे निर्णय घेत आहोत, ते पुढील हजार वर्षांचं भविष्य ठरवणारे आहेत. मोदी म्हणाले, “या वर्षीचा सिव्हिल सर्व्हिस डे अनेक कारणांनी खूप खास आहे. यंदा आपण आपल्या संविधानाचा ७५ वे वर्ष साजरा करत आहोत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती देखील आहे. २१ एप्रिल १९४७ रोजी सरदार पटेल यांनी सिव्हिल सेवकांना ‘भारताचं स्टील फ्रेम’ म्हटलं होतं, म्हणजेच प्रामाणिकपणा आणि शिस्तीने भरलेले सेवक.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “सरदार पटेल यांनी स्वतंत्र भारतासाठी एक नवा ब्युरोक्रॅसीचा आदर्श निर्माण केला होता – एक असा सिव्हिल सर्व्हंट जो राष्ट्रसेवेला सर्वोच्च कर्तव्य मानतो, जो लोकशाही पद्धतीने प्रशासन चालवतो, जो प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि समर्पित असतो. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणाचा संदर्भ देत म्हटले, “मी काही काळापूर्वी लाल किल्ल्यावरून म्हटलं होतं की, आजच्या भारताला पुढील १००० वर्षांच्या भविष्याची पायाभरणी करायची आहे. एका अर्थाने पाहिलं तर या सहस्त्रकातील पहिली २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. हे वर्ष नव्या शतकाचं आणि नव्या सहस्त्रकाचंही २५ वे वर्ष आहे. आपण जे काही निर्णय घेत आहोत, ते भविष्यासाठी अत्यंत निर्णायक आहेत.
हेही वाचा..
राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणातून वाचू शकणार नाहीत
चारधाम यात्रेसाठी १९ लाखांहून अधिक भाविकांनी केली नोंदणी
महिलांच्या अनेक समस्यांवर उपाय ‘अशोक वृक्ष’
पुढे ते म्हणाले, “आपण आज ज्या जगात राहतो आहोत ते खूप वेगाने बदलतंय. आपली प्रशासन प्रणाली आणि धोरणनिर्मिती जुन्या पद्धतीने चालू शकत नाही. त्यामुळेच २०१४ पासून व्यवस्थात्मक बदल हाती घेतले गेले आहेत. भारताचा आकांक्षी समाज – तरुण, शेतकरी, महिला – यांचे स्वप्नं आणि आकांक्षा वेगळ्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी अभूतपूर्व वेगाने प्रगती करणं आवश्यक आहे.
विकसित भारताबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकासरथाचे प्रत्येक चक्र एकत्र फिरणं आवश्यक आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, संपूर्ण समर्पणाने या उद्दिष्टासाठी कार्य करायचं आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपली संपूर्ण ऊर्जा समर्पित करायची आहे. यावर्षी सिव्हिल सर्व्हिस डेची थीम “भारताचा समग्र विकास” यावर त्यांनी समाधान व्यक्त करत म्हटले, “ही थीम फक्त एक घोषवाक्य नाही, तर राष्ट्रप्रतीची आपली कटिबद्धता दर्शवते. समग्र विकास म्हणजे कोणताही कुटुंब, नागरिक किंवा गाव मागे राहू नये. खऱ्या अर्थाने प्रगती म्हणजे केवळ लहानसहान बदल नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर होणारा परिणाम महत्त्वाचा आहे. प्रत्येक घरात शुद्ध पाणी, प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे.