28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषदेशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार

देशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार

केंद्रीय गृहमंत्रालयाची घोषणा

Google News Follow

Related

देशभरात आता दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

गृह मंत्रालयाने याबद्दल अधिसूचना जारी केली आहे. हैदराबाद १५ ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र झाल्यानंतर देखील १३ महिने निजामांच्या शासनाखाली होता आणि त्याला स्वतंत्र्य मिळाले नव्हते. ऑपरेशन पोलो नावाच्या पोलीस कारवाई नंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या शासनापासून मुक्तता मिळाली. गृह मंत्रालयाने म्हटलं की या भागातील लोकांती मागणी होती की १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजार केला जावा. तसेच हैदराबादला स्वतंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीदांच्या आठवणीत आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी मोदी सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानी नागरिक म्हणातायत, पंतप्रधान मोदींना सलाम!

लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!

उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता

राजस्थानमध्ये तेजस विमान कोसळले

१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस १७ सप्टेंबर ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आता दरवर्षी देशभरात ‘हैद्राबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार आहे. भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीखाली होते. यावेळी रझाकारांनी येथील लोकांवर खूप अत्याचार केले. तेव्हा हैदराबादच्या तत्कालीन निजामाने भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध करत पाकिस्तानात सहभागी होण्याची किंवा मुस्लीम देशाची मागणी केली होती. तेव्हा येथील नागरिकांनी हैदराबाद भारतात विलीन करण्यासाठी रझाकारांच्या अत्याचाराविरोधात लढा दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा