रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला. रेवंत रेड्डी सरकारकडून संपूर्ण रमजान महिन्यात राज्यातील सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर भाजपाकडून टीका केली जात आहे.
सरकारी आदेशानुसार, या कर्मचाऱ्यांना २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत काम करण्याचे सांगण्यात आले आहे. ४ नंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. तथापि, जर कोणत्याही कर्मचाऱ्याचे काम जास्त आवश्यक असेल तर त्याला कार्यालयातच राहावे लागेल, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी हा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले असून भाजपने या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.