बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी महागठबंधनावर जोरदार टीका करत म्हटले की, “त्यांचा झालर आता शॉर्ट सर्किटच्या झटक्यात अडकला आहे, त्यामुळे आता काही होणार नाही. बिहारची जनता त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे.” नकवी म्हणाले, “महागठबंधनातच अंतर्गत फाईट सुरू आहे. आणि हे लोक पुन्हा एकदा बिहारमधील मुसलमानांना मतांचं पंचिंग बॅग बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. विकासाच्या नावाखाली मतं मागणारे कधीच विकास करत नाहीत. त्यामुळे आता मुसलमानांनी पुढाकार घेऊन या लोकांना झटका द्यायला हवा.”
‘जननायक’ वादावर भाष्य करताना नकवी म्हणाले, “बिहारचा खरा जननायक म्हणजे गावातला, गरीब, शेतकरी आणि झोपडपट्टीत राहणारा सामान्य माणूस आहे. बिहारचा अस्सल जननायक तो आहे, जो इतिहासाशी जोडलेला आहे आणि ज्याने देशभर विश्वासाची एक वेगळी लहर निर्माण केली आहे. राहुल गांधी जर खोटा जननायक बनून खोट्या वचनांत अडकून राहतील, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सामंती सुलतानपासून खऱ्या जननायकापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील.”
हेही वाचा..
बिहार: प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी, महिलांना दरमहा रुपये २५००, मोफत वीज!
आणखी एक भव्य राममंदिर उभारले जाणार….
सीपीसी केंद्रीय समितीने सुचवलेले मार्गदर्शन पारित
अभिनेते सतीश शाह यांचे निधन किडनी निकामी झाल्यामुळे नाहीतर ‘या’ कारणामुळे!
वक्फ कायदा विषयावर राजद नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांनी म्हटले, “हा कायदा श्रद्धेच्या संरक्षणासाठी आहे. ज्यांची दुकाने या आधी चालत होती, त्यांच्याच पोटात आता दुखत आहे. कायदा फाडण्यासाठी नसतो, तर तो जमिनीवर मजबुतीने उतरवण्यासाठी असतो.” एसआयआर (SIR) विषयावर विरोधकांच्या प्रतिक्रिया नाकारत नकवी म्हणाले, “प्रत्येक समावेशक आणि घटनात्मक सुधारणांवर राजकीय आणि सांप्रदायिक प्रहार करणे काही लोकांची सवय झाली आहे. समाजात भीती आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पण तो आता यशस्वी होणार नाही. मतदार याद्यांचे शुद्धीकरण अभियान पुढे सुरू राहील. अराजकता आणि उद्दंडतेने ते थांबवता येणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “मतदार याद्यांचे शुद्धीकरण हे कोणत्याही राजकीय सूडासाठी नाही. काही लोकांना देशहितातील प्रत्येक सुधारणा पाहिली की काल्पनिक गोंधळ निर्माण करण्याची गुन्हेगारी सवय लागली आहे. ते देशहिताचा विचार करत नाहीत, फक्त संभ्रम आणि अफवा पसरवतात.” नकवी म्हणाले, “एसआयआर पहिल्यांदाच होत नाही; ते आधीही झाले आहे. भारत हा लोकशाही देश आहे, जिथे अवैध मतदारांची पडताळणी आणि वैध मतदारांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते.”







