महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. मालेगावमध्ये SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट मतदार नोंदणी आणि मॅपिंग झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणाची ‘व्होट जिहाद’ या दृष्टिकोनातून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये सोमय्या यांनी दावा केला आहे की, SIR च्या पहिल्या टप्प्यानंतर तयार झालेल्या पडताळणी यादीत एकाच व्यक्तीचे नाव आणि छायाचित्र अनेक वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आढळून आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अदनान अली यांची नोंद सात ठिकाणी, खान फराज यांची तीन ठिकाणी, तर सुलताना नावाच्या मतदाराची नोंद पाच वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर दिसून आली आहे. अशा प्रकारे अनेक मतदारांची नावे आणि छायाचित्रे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
SIR Malegaon
Vote JihadBogus mapping in SIR campaign in Malegaon!!??
Mapping, matching, approval of the same person in many booths…Adnan Ali in 7 places/booths
Khan Faraz in 3 places
Sultana… in 5 placesMany Voters Names (same person, with same photos) appearing many… pic.twitter.com/aeTOjwmp87
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2026
यापूर्वी किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहून बांद्रा पूर्व विधानसभा मतदारसंघातील SIR प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, आधीच पाडण्यात आलेल्या गरीब नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावांचे मतदार मॅपिंग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आले. SIR च्या पहिल्या टप्प्यात ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांनी गरीब नगरमधील २,४१२ मतदारांपैकी १,२९६ मतदारांची नोंद वैध ठरवली, जरी त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडे आधीपासून उपलब्ध होती. गरीब नगर हटविण्यात आल्याची माहिती इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर (ERO) आणि संबंधित BLO यांना देण्यात आली होती. मात्र, ही बाब दुर्लक्षित करून मॅपिंगची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा:
पीओके आंदोलनात लष्कर, जैशच्या दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट?
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निष्क्रियतेमुळे यूएनवरील विश्वास ढासळतोय
पुतिन यांना अण्वस्त्र वापरण्यापासून पंतप्रधान मोदींनी रोखले!
भारत ठेवणार प्रत्येक भारतीय खलाशावर लक्ष
सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित केला की, ज्या परिसरात आता कोणतेही रहिवासी नाहीत, त्या ठिकाणच्या मतदारांची पडताळणी कशी करण्यात आली? मतदारांची नावे वगळण्याऐवजी स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या भागात विशेष शिबिरे भरवून त्यांना SIR प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याचा दावाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.







