28.7 C
Mumbai
Friday, June 20, 2025
घरविशेषमायानगरी सोडून गावी का स्थायिक झाले नाना पाटेकर?

मायानगरी सोडून गावी का स्थायिक झाले नाना पाटेकर?

Google News Follow

Related

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ‘कौन बनेगा करोडपती १७’ या क्विझ आधारित रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहुणा कलाकार म्हणून सहभागी झाले आणि हॉट सीटवर विराजमान झाले. यावेळी त्यांनी मुंबईसारखी मायानगरी सोडून गावात का स्थायिक झाले, याची मनमोकळी कारणं खुद्द अमिताभ बच्चन यांच्यासमोर सांगितली. अमिताभ बच्चन यांनी विचारले, “तुम्ही आयुष्यात इतकं काही मिळवलं, पण तरी सगळं सोडून गावाकडे का गेलात?” यावर नाना पाटेकर यांनी अत्यंत साधेपणाने आणि भावुक होऊन उत्तर दिलं, “मी फिल्म इंडस्ट्रीचा माणूस नाही. मी फक्त काम करायला येतो आणि परत जातो. मी कधीच कुठल्या पार्टीला गेलो नाही, ना फारसा शहरात थांबलो. मी गावचा माणूस आहे आणि तिथेच राहणं मला अधिक प्रिय वाटतं. गावचं जीवन मला आवडतं.”

नानांनी आपल्या आईबद्दल बोलताना भावुक होत सांगितलं, “माझ्या आईकडून मला जेवढं हवं होतं त्यापेक्षा खूप अधिक मिळालं आहे. गरजा मर्यादित ठेवणं खूप सोपं असतं. माझ्याकडे एसी नाही, कारण त्याची गरज वाटत नाही. शहरात जसं चहू बाजूंनी भिंती असतात, तसं माझ्या घराभोवती डोंगर आहेत. त्या डोंगरांनी वेढलेलं माझं घर आहे, आणि मी तिथे अत्यंत सुखात राहतो. मला ती जागा खूप प्रिय आहे.” या एपिसोडमध्ये नानांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावरही भरभरून प्रेम व्यक्त केलं.

हेही वाचा..

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने

कोथंडारामस्वामी मंदिरात तब्बल ८३ वर्षांनंतर रथयात्रा

आप, काँग्रेसने झोपडपट्टीवासियांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवलं

दिशा सालियानच्या मृत्यूला ५ वर्षे पूर्ण

जेव्हा एका प्रेक्षकाने नाना पाटेकर यांना विचारलं की, ‘वजूद’ चित्रपटात माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, “माधुरी दीक्षितसोबत काम करणं हे एक अप्रतिम अनुभव होतं. त्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत, सुंदर आहेत, जबरदस्त डान्सर आहेत आणि ज्या प्रत्येकात असावं असं वाटतं ते सर्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. मी त्यांना अत्यंत सन्मानाने पाहतो. शोमध्ये एका प्रेक्षकाने नानांना ‘वजूद’ चित्रपटात माधुरी दीक्षितसाठी त्यांनी म्हटलेली कविता ‘कसे सांगू तुला…’ याबाबत विचारलं. यावर हसत नाना म्हणाले, “ती कविता जावेद अख्तर साहेबांनी लिहिली होती. त्या चित्रपटाला जवळपास ३०-३५ वर्षं झाली असतील, पण ती कविता आजही मला आठवते. ती कविता मी माधुरीला म्हणून दाखवली होती, म्हणून ती विसरणं कठीण आहे. आजही ती कविता जणू माझ्या रक्तातच वाहत आहे असं वाटतं. जेव्हा कोणी ती आठवण काढतं, तेव्हा अनेक आठवणी मनात ताज्या होतात.”

या एपिसोडमध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत अभिनेता उत्कर्ष शर्मा, अभिनेत्री सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा देखील सहभागी झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
252,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा