27 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरविशेषमुख्यमंत्री म्हणाले, 'या' कारणासाठी मनसेच्या मोर्च्याला परवानगी नाकारली!

मुख्यमंत्री म्हणाले, ‘या’ कारणासाठी मनसेच्या मोर्च्याला परवानगी नाकारली!

अटकेतील कार्यकर्त्यांना सोडल्याची माहिती 

Google News Follow

Related

मराठी भाषेवरून मीरा भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना राज्य पोलिसांनी अटक केली. मोर्च्याला परवानगी देण्यात आली नव्हती तसेच परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या आदेशांना झुगारून कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान, मनसेच्या मोर्च्याला परवानगी का नाकारली याचे कारण समोर आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जेव्हा मी पोलिस आयुक्तांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की पोलिस विभागाने मोर्चेकऱ्यांना मार्ग बदलण्यास सांगितले होते, परंतु ते या मार्गावरूनच मोर्चा काढणार असे सांगत अडून राहीले. म्हणूनच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली.”

मीरा-भाईंदरला राजकारणाची नवी प्रयोगशाळा बनवली जात आहे का?, असा प्रश्न विचारला असता. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मराठी लोक लहान आणि संकुचित विचार करू शकत नाहीत, कारण जेव्हा देशावर हल्ला झाला तेव्हा मराठी लोक फक्त महाराष्ट्राचाच विचार करत नव्हते तर संपूर्ण भारताचा विचार करत होते आणि त्यांच्या जीवाची पर्वा न करता लढायला गेले होते. म्हणूनच मराठी लोक कधीही लहान विचार करू शकत नाहीत. म्हणूनच कोणी प्रयोग करून पाहिला तरी तो यशस्वी होणार नाही.”

हे ही वाचा : 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पितृशोक

पश्चिमोत्तानासनाचा प्रभावी उपाय कशाकशावर ?

मुजफ्फरनगरमध्ये कावड खंडित केल्याच्या प्रकाराने तणाव

ब्रिक्स अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी भारत सज्ज

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अलिकडच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, “जर तुम्ही निशिकांत दुबे यांचे विधान पूर्णपणे ऐकले तर ते संपूर्ण मराठी समाजाबद्दल बोलत नव्हते, ते फक्त मनसे संघटनेबद्दल बोलत होते, तथापि, असे बोलणे अयोग्य आहे असे माझे मत आहे. कारण या गोष्टींमधून निघणारा अर्थ लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करतो.

महाराष्ट्रात मराठी लोकांचे ऐतिहासिक योगदान खूप मोठे आहे. जेव्हा परकीय आक्रमकांनी भारताची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती जिवंत ठेवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतर मराठ्यांनी केली. आजही आपले महाराष्ट्र राज्य देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील मराठी लोकांचे देशाला दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा