पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन भविष्यातील सुधारणा याबाबत चर्चा केली. ही बैठक अमेरिकेकडून भारतावर लादलेल्या २५% आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर झाली, त्यामुळे त्याला महत्त्व आहे.
दिल्लीतील लोक कल्याण मार्ग क्रमांक ७ येथील निवासस्थानी झालेल्या या आर्थिक सल्लागार परिषद (EAC) बैठकीत केंद्रीय सचिव, अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते.
मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली की, भविष्यातील सुधारणांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. सर्व क्षेत्रांमध्ये जलद सुधारणा करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. बैठकीचे महत्त्व असेही होते की, त्याच दिवशी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारताच्या दोन दिवसांच्या भेटीवर आले, आणि काही दिवसांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रशियाला जाणार आहेत. हे सर्व अमेरिका-भारत व्यापार तणावाच्या अनिश्चिततेच्या काळात घडत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निर्यातीवर २५% आयात शुल्क लादले असून २७ ऑगस्टपासून ते दुप्पट करून ५०% करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रशियाकडून भारताच्या तेल खरेदीमुळे घेतला गेला आहे. याचा अंदाजे ४० अब्ज डॉलर्सच्या (रत्ने-आभूषणे, वस्त्रउद्योग, पादत्राणे) भारतीय निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.
हे ही वाचा:
पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, काय झाली चर्चा?
“पाकिस्तानसारखं राहुल गांधींचंही प्रत्येक राजकीय लाँच अपयशी ठरतं”
पोलिसकाका, खरंच तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंत..!
राधाकृष्णन यांना दिलेली संधी हे चांगलेच पाऊल
दरम्यान, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या (BTA) सहाव्या फेरीचे वाटाघाटी २५ ते २९ ऑगस्टदरम्यान होणार होत्या, परंतु अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींचा दौरा पुढे ढकलला गेला आहे. तरीही दोन्ही देशांनी २०२५ च्या उत्तरार्धापर्यंत पहिल्या टप्प्यातील करार पूर्ण करण्याचे आणि २०३० पर्यंत १९१ अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापाराला ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
अमेरिका भारतावर शेती व दुग्धव्यवसायासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे खुली करण्यासाठी दबाव टाकत आहे, मात्र भारताने ठामपणे नकार देत सांगितले की अशा सवलतींमुळे शेतकरी आणि गाई-म्हशी पाळणाऱ्यांचे जीवन धोक्यात येईल.
याच पार्श्वभूमीवर मोदींनी स्वातंत्र्य दिन भाषणात ‘स्वदेशी’ उत्पादनांवर भर देण्याचे आवाहन केले व शेतकरी व मच्छीमारांबाबत ठाम भूमिका मांडली. “शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांसाठी हानिकारक धोरणांविरुद्ध मोदी भिंतीसारखे उभे आहेत. त्यांच्याविषयी कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही.”
दरम्यान, शनिवारी अलास्कामध्ये (भारतीय वेळेनुसार) ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेन युद्धावर महत्त्वाची चर्चा झाली. यामुळे अमेरिका-रशिया संबंध सुधारल्यास भारतावरचा अतिरिक्त २५% शुल्काचा ताण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तणाव असूनही भारत-अमेरिका व्यापारात वाढ होत आहे. एप्रिल-जुलै २०२५ दरम्यान भारताच्या अमेरिकेला निर्यातीत २१.६४% वाढ होऊन ती ३३.५३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर आयातीत १२.३३% वाढ होऊन ती १७.४१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, अशी वाणिज्य मंत्रालयाची माहिती आहे.







