जगात युद्धाची धामधुम सुरू आहे. सागरी व्यापार मार्गाची कोंडी केली जात आहे. जागतिक अर्थकारणावर युद्धाचे गडद सावट असताना भारताच्या विकासदराची कमान चढती आहे. कोणत्याही देशभक्त व्यक्तिला अभिमान वाटेल, असे हे आकडे आहेत. विदेशी मीडियानेही भारताच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे. वाढत्या जीडीपीमुळे इंडिया ‘इज डेड इकोनॉमी’, असे विधान करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची री ओढणारे भारतीय राजकारणातील राजपाल यादव अर्थात राहुल गांधी यांचे थोबाड पुन्हा एकदा फुटले आहे. देशाचे काही बरे होत असेल तर काँग्रेसला पोटदुखी होते. ही पोटदुखी काँग्रेसने कोणती लाज न बाळगता व्यक्तही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया जीडीपी इतकीच दमदार आहे. ‘जागतिक अनिश्चिततेच्या काळात, तेलाच्या किमतीतील चढउतार, पुरवठा साखळीतील अडचणी असतानाही भारताने एवढी दमदार वाढ साध्य केली. यामागे देशातील जनतेची सामुहीक ताकद आणि योगदान आहे. निराशावादी भाकीते करणाऱ्यांचे अंदाज पुन्हा एकदा फोल ठरले आहेत.’ Doomsayer were doomed and India bloomed…yet again! हे पंतप्रधानांचे वाक्य आहे. या वाक्याला शंभर तोफांची सलामी. पंतप्रधानांचा हा टोल फक्त राहुल गांधींना नाही, तो ट्रम्प यांनाही आहे. भारत गुढग्यावर यावा, सरपटत अमेरिकेला शरण यावा ही ट्रम्प आणि त्यांच्या मंत्र्यांची इच्छा होती. ती पूर्ण होताना दिसत नाही



