34 C
Mumbai
Thursday, April 23, 2026
घरक्राईमनामा‘रामायणा’वर वादग्रस्त विधान केल्याबद्दल प्रकाश राज यांच्यावर गुन्हा

‘रामायणा’वर वादग्रस्त विधान केल्याबद्दल प्रकाश राज यांच्यावर गुन्हा

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Google News Follow

Related

अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी रामायणातील एक कथा सांगितली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर प्रकाश राज यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका कार्यक्रमात रामायणातील कथेचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, राम आणि लक्ष्मण यांनी रावणाच्या बागेतून फळे चोरली होती.

प्रकाश राज यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आपला मुद्दा मांडण्यासाठी रामायणाचा संदर्भ देताना दिसत आहेत. रामायणाच्या कथेच्या त्यांच्या आवृत्तीत ते म्हणाले की, “राम, लक्ष्मण आणि सीता दक्षिणेकडे येत होते. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, राम! आपण किती भाग्यवान आहोत. ते जंगल बघ. राम म्हणाले, नाही, हे कोणाचे तरी शेत आहे. लक्ष्मणाने विचारले, तिथे फळे आहेत. आपण ती खाऊ शकतो का? राम म्हणाले, हो. लक्ष्मणाने विचारले, पण ही चोरी होणार नाही का? राम म्हणाले, नाही! जर तुम्हाला भूक लागली असेल, तर तुम्ही खाऊ शकता. जेव्हा ते फळे खाऊ लागले, तेव्हा शूर्पणखा आणि रावण आले. शूर्पणखेला राग आला. ती म्हणाली, भाऊ, हे लोक फळे खात आहेत. रावणाने उत्तर दिले, ते भुकेले आहेत. त्यांना खाऊ दे. आपण त्यांच्याशी नंतर बोलू. राम लक्ष्मणाला म्हणतात, काही आदिवासी (रावण आणि शूर्पणखा) आले आहेत. रावण म्हणाला, नाही! आम्ही मालक आहोत.

कथा पुढे नेत, प्रकाश राज यांनी जीएसटी आणि उत्तर-दक्षिण वादाचा मुद्दाही आणला. प्रकाश राज म्हणाले, राम म्हणाला, आम्ही फळे खाल्ली आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला पैसेही देऊ. यावर शूर्पणखेने हिशोब करून सांगितले, जीएसटीसह तुमच्याकडे २००० डॉलर झाले आहेत. राम आणि लक्ष्मण म्हणाले, नाही! आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून रावणाने त्यांना २०% सूट दिली. पण ते म्हणाले, नाही, आमच्याकडे पैसे नाहीत. यावर रावण म्हणाला, सूट देऊनही तुमच्याकडे पैसे नसतील, तर इथेच काम करा. तुम्ही खाल्लेल्या फळांच्या बिया लावा, एक झाड तयार करा आणि परत जा.

हे ही वाचा:

इराण युरेनियमचा साठा सोपवण्यास सहमत

निदा खान आली समोर! गर्भवती असल्यामुळे जामीन द्या!

नोएडा कामगार आंदोलनामागे ‘पाकिस्तान लिंक’; नियोजित कट असल्याचे उघड

सातवे सोनेरी पान लिहिले जाते आहे… ज्येष्ठ संघकर्मी भैय्याजी जोशी

आपली ‘रामायणाची’ आवृत्ती सांगताना, प्रकाश राज उत्तर-दक्षिण वादावर टोला लगावत होते. त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांच्यावर हिंदी लादू नका असे आवाहन केले. ते म्हणाले, “बँक मॅनेजर बनून आम्हाला गोमांस खाण्यापासून रोखू नका. आम्ही तर गोमांस महोत्सवसुद्धा आयोजित करू.”

आता प्रकाश राज यांच्या या व्हिडिओमुळे मोठा गदारोळ माजला आहे. संतप्त लोकांनी त्यांना ‘वाराणसी’ चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, प्रकाश राज या चित्रपटात एका शिवभक्ताची भूमिका साकारणार आहेत. एकाने म्हटले आहे की, स्वतःच्या संस्कृतीचा आदर करण्याबद्दल बोलताना त्यांनी आमच्या संस्कृतीचा अपमान केला. काहींनी तर त्यांच्यावर उत्तर आणि दक्षिणमध्ये फूट पाडण्याचा आरोपही केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा