25 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरक्राईमनामाजम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार

हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर

Google News Follow

Related

जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता दहशतवाद्यांनी आणखी एका ठिकाणी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता. यानंतर बस चालकाला गोळी लागल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते.

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या चकमकीत भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्तुरात १ दहशतवादी ठार झाला आहे. तर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दिली आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये तीन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. अद्यापही दहशतवादी लपल्याचा संशय लष्कराला असून शोधमोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरोच आंतरराष्ट्रीय सीमा, महामार्ग, पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चौक्यांवरही विशेष नजर ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!

मलावीच्या उपराष्ट्रपतींचा विमान अपघातात मृत्यू!

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!

“गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत घेतले”

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांच्या बसवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशात पर्यटक आणि गैरस्थानिकांना अशा प्रकारच्या हल्ल्यांचा इशारा दिला आहे. TRF ला २०२३ साली भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. या घटनेनंतर आता या भागात सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा