पाकिस्तानच्या कुरघोड्यांना भारताकडून जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरूचं असून भारतविरोधी कारवायांना वेग आला आहे. आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेल्या पाकिस्तानपुढे आता भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इतर देशांकडे हात पसरवण्याची वेळ आली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतवादी पायाभूत सुविधा आणि त्यांच्या समर्थन संरचनेचे नुकसान होत असताना, पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्ज देण्याची विनंती केली आहे. तणाव कमी करण्यास मदत करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारांनाही आवाहन केले आहे. पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाशी संबंधित असलेल्या एका अकाउंटवर ही विनंती केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शत्रूमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन करते. तसेच आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो. राष्ट्राला स्थिर राहण्याचे आवाहन करतो.”
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कर्जाची मागणी करणारी पोस्ट समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने मात्र शुक्रवारी त्यांचे अधिकृत एक्स अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीत आहे. आयएमएफचे पाकिस्तानचे थकित कर्ज अंदाजे ८.८ अब्ज डॉलर्स होते. पाकिस्तान हा आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदार देश आहे. शेअर बाजारही सातत्याने कोसळत असून पाकिस्तानसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. २३ एप्रिलपासून पाकिस्तानचा बेंचमार्क केएसई- १०० निर्देशांक ७,५०० पेक्षा जास्त अंकांनी किंवा ६% ने घसरला आहे.
हे ही वाचा :
भारतावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही!
IPL 2025 : धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द
हिटमॅनचा टेस्ट क्रिकेट प्रवास: रोहित शर्माची संस्मरणीय कारकीर्द
अमृतसर ते जम्मू, पठाणकोट ते भूज पर्यंत पाकिस्तानचे हल्ले उधळून लावणारा ‘सुदर्शन चक्र’
यापूर्वी सोमवारी, मूडीजने इशारा दिला की भारतासोबतच्या तणावात सतत वाढ झाल्याने पाकिस्तानच्या वाढीला धक्का बसू शकतो, त्याचे वित्तीय एकत्रीकरण आणि व्यापक आर्थिक स्थिरता प्रभावित होऊ शकते. गुरुवारी, भारताच्या सशस्त्र दलांनी ७-८ मे रोजी रात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक भारतीय लष्करी प्रतिष्ठानांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पाकिस्तानी सैन्याच्या प्रयत्नांना यशस्वीरित्या निष्क्रिय केले आणि लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली.