33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरराजकारणनव्या कृषी कायद्यांत ‘मंडी बंद करणार’ असे कुठे लिहीले आहे ते दाखवा…

नव्या कृषी कायद्यांत ‘मंडी बंद करणार’ असे कुठे लिहीले आहे ते दाखवा…

Google News Follow

Related

लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात नव्या कृषी कायद्यांवरून चांगलीच जुंपलेली आहे. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने उत्तरे दिली जात आहेत. भाजपाकडून सातत्याने कृषी कायद्यांतील वाईट बाबींवर चर्चा करण्याचे आवाहन होत असताना, काँग्रेसकडून मात्र मुद्देसूद उत्तरे दिली जाऊ शकलेली नाहीत.

हे ही वाचा: 

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा लोकसभेत तमाशा

नुकताच लोकसभेत असाच आणखी एक किस्सा घडला. काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी कृषी कायद्यांविषयी बोलायला सुरूवात केली. मात्र बोलताना ते म्हणाले की ‘या कायद्यात मंडी बंद करून खासगी मंड्यांची निर्मीती करण्यात येईल.’ मात्र यावर भाजप सभासदांनी तिव्र आक्षेप नोंदवला. कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी लोकसभेत प्रतिप्रश्न केला आणि ‘कोणत्या कलमाखाली मंडी बंद करणार असल्याचा उल्लेख केला आहे ते दाखवावे’ असे आव्हान देखील केले. या बाबतचा लोकसभेतला व्हिडियो देखील त्यांनी ट्वीट केला आहे.

अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच या अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाची छाया आहे. जरी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरीही सातत्याने कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा होत आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण चालू असताना काँग्रेस सदस्यांनी त्यात वारंवार अडथळा देखील निर्माण केला आणि नंतर सभात्याग देखील केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा