31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणपंजाबनंतर छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बदलणार?

पंजाबनंतर छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बदलणार?

Google News Follow

Related

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्यमंत्री टीएस सिंह देव यांच्यातील सत्तासंघर्ष वरवर शांत झाल्याचे दिसून येत आहे, परंतु सत्ताधारी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्तरावर हे भांडण वाढताना दिसून येत आहे. काँग्रेस शासित पंजाबमध्ये अलीकडील नेतृत्वात झालेल्या बदलामुळे अनिश्चिततेत भर पडली आहे.

सिंह देव कॅम्पने दावा केला की, बघेल यांनी जून २०२१ मध्ये मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे पूर्ण केल्यानंतरनेतृत्व बदलावे. २०१८ मध्ये हायकमांडने सरकारला त्यांचा अर्धा कार्यकाळ पूर्ण केल्यावर पद सोपवण्याची ग्वाही दिली होती. असंही त्यांचा म्हणणं आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी पीएल पुनिया यांनी वेळोवेळी २०१८ मध्ये असा कोणताही करार झाल्याचे नाकारले आहे. जेव्हा काँग्रेस पक्ष १५ वर्षानंतर सत्तेत आला होता.

जुलै महिन्यात काँग्रेसचे आमदार ब्रृहस्पत सिंह यांनी सिंह देव यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. सिंग देव यांच्या सरगुजा येथील आमदाराने नंतर हा दावा मागे घेतला. कॉंग्रेस हायकमांडने भांडण सोडवण्यासाठी बघेल आणि सिंह देव या दोघांना ऑगस्टमध्ये दिल्लीला बोलावले. असे दिसून आले की बघेल यांनी ही फेरी जिंकली होती जेव्हा त्यांनी परत आल्यावर पत्रकारांना सांगितले की, पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ‘त्यांच्या आमंत्रणावर’ राज्याच्या दौऱ्याला सहमती दर्शविली आहे. जे मुख्यमंत्री पद बदलण्याविषयी बोलत आहेत ते राजकीय अस्थिरतेला प्रोत्साहन देत आहेत.

बघेल राष्ट्रीय राजधानीत असताना काँग्रेसच्या ७० पैकी ५४ आमदारांनी स्वतंत्रपणे दिल्लीला भेट दिली होती. बघेल आणि सिंह देव दोघेही तेव्हापासून नेतृत्वाच्या मुद्द्यावर काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु हे भांडण कमी झालेले नाही. मंगळवारी, बिलासपूर पोलिसांनी सरकारी काँग्रेसच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव आणि सिंह देव यांचे समर्थक पंकज सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या दिवशी, काँग्रेसचे आमदार शैलेश पांडे, सिंह देव यांचे आणखी एक कट्टर समर्थक, त्यांच्या समर्थकांसह पोलीस स्टेशन गाठले आणि कारवाईचा निषेध नोंदवला. कोणाचेही नाव न घेता पांडे यांनी ही कारवाई वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप केला.

हा मुद्दा तिथेच संपला नाही कारण गुरुवारी बिलासपूर जिल्ह्यातील पक्षाच्या स्थानिक युनिटने “पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी” पांडे यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली. बिलासपूर शहर काँग्रेस कमिटीचे प्रमुख प्रमोद नायक म्हणाले की, त्यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख मोहन मरकम यांना पांडे यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.

हे ही वाचा:

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी लावला रोहित शर्माला व्हिडिओ कॉल

४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट

नायक पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अटल श्रीवास्तव यांच्यासोबत होते, जे मुख्यमंत्री बघेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. जोपर्यंत पक्ष हायकमांड नेतृत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टता आणत नाही, तोपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांना दोन वरिष्ठ नेत्यांमधील संघर्षाची किंमत मोजावी लागेल, असे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आर कृष्ण दास म्हणाले. पंजाबमधील अलीकडील नेतृत्व बदलामुळे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चिततेची भावना निर्माण झाली आहे, असे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा